‘म्युकरमायकोसिस’बाबत फक्त घोषणा, अजून किती बळी घेणार आहात? राजू शेट्टींचा सवाल

| Updated on: May 14, 2021 | 8:55 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

म्युकरमायकोसिसबाबत फक्त घोषणा, अजून किती बळी घेणार आहात? राजू शेट्टींचा सवाल
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us on

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात म्युकरमायकोसिस या आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजारात रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचे 1 हजार 500 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. तसंच या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण याबाबत अद्याप शासन आदेश निघालेला नाही. त्यामुळे म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना या योजनेत समावेश होत नाही. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. (Raju Shetty’s question on the announcement made by Rajesh Tope regarding mucormycosis)

“कोरोना नंतर होणाऱ्या Mucormycosis या आजारावरील उपचार जनआरोग्य योजने अंतर्गत होईल अशी घोषणा आरोग्य मंत्र्यांनी करून 4 दिवस झाले.आद्यप शासन निर्णय झालेला नाही.खासगी दवाखाने उपचारासाठी 10 लाख पॅकेजची मागणी करतात. Ambisome या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे,काळा बाजार होतोय. सर्वसामान्य, गोरगरीब आपला जीव गमावतायत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात 4 रुग्णांनी जीव गमावला,5 रुग्ण अत्यावस्थ आहेत.शासन निर्णय होणार कधी? अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?”, असे प्रश्न राजू शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला विचारले आहेत.

‘म्युकरमायकोसिस’बाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

आजाराबाबत ठाकरे सरकारनं मोठी घोषणा केली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली 4 दिवसांपूर्वी दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर योग्य वेळी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ठाकरे सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

राजेश टोपेंच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या

महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत 6 हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला 20 – 20 इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराबाबत जनजागृतीची गरज असल्याचं टोपे म्हणाले. काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याचं टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

कोरोना संकटातही ‘या’ क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा पगार दुप्पट वाढला, जाणून घ्या किती फायदा?

Video : कॅन्सर पीडित चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टर आणि नर्सेसचा आनंद गगनात मावेना!

Raju Shetty’s question on the announcement made by Rajesh Tope regarding mucormycosis