AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेठीतील रुग्णाच्या मृत्यूबाबतचा स्‍मृती इराणींचा दावा खोटा?

अमेठी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर आरोप करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अनेक दावे केले जातात. मात्र, हे दावे तपासले असता त्याचे वास्तव पूर्णपणे वेगळेच असल्याचे समोर येते. असाच प्रकार  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याबाबतही झाला आहे. इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयावर एका व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला […]

अमेठीतील रुग्णाच्या मृत्यूबाबतचा स्‍मृती इराणींचा दावा खोटा?
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

अमेठी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर आरोप करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अनेक दावे केले जातात. मात्र, हे दावे तपासले असता त्याचे वास्तव पूर्णपणे वेगळेच असल्याचे समोर येते. असाच प्रकार  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याबाबतही झाला आहे. इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयावर एका व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. मोदींनीही हेच आरोप करत राहुल गांधींवर टीका केली होती. मात्र, यामागील सत्य पूर्णपणे वेगळेच निघाले.

पंतप्रधान मोदी आणि स्‍मृती इराणी यांच्या व्यतिरिक्त मृत रुग्णाच्या नातेवाईकांनीही रुग्णालयावर आरोप केले होते. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, रुग्ण नन्‍हे लाल मिश्रा यांना आयुष्मान भारत योजना मोदी-योगींची असल्याचे सांगत संजय गांधी रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. तसेच या ठिकाणी फक्त राहुल गांधींची योजना चालते असेही सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यानंतर हा विषय देशभरातील माध्यमांनी उचलून धरला.

दुसरीकडे या प्रकरणाची शहानिशा केली असता वास्तव अगदी उलटे असल्याचे समोर आले आहे. टीव्ही 9 ने मृत रुग्ण नन्‍हें लाल मिश्राला ज्या रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे सांगितले, त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित रुग्णाला 25 एप्रिलला रुग्णालयात दाखल केल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाला दारुचे व्यसन होते. त्यामुळेच त्याला भरती करण्यात आले होते. रुग्णालयाने मिश्रा यांना दाखल करुन घेतले, तेव्हा त्यांचे कुटुंबीय आयुष्‍मान कार्ड घेऊन येण्यास विसरले होते. तरिही रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला भरती करुन घेतले आणि आयुष्मान कार्ड दुसऱ्या दिवशी आणण्यास सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी या रुग्णाचा मृत्यू झाला आणि मग कुटुंबीय आयुष्मान कार्ड घेऊन आले. यावेळी रुग्णालयाने आता याक्षणी रुग्णाच्या भरतीची नोंद मागील तारखेला करता येणार नाही, असे सांगितले. रुग्णालयाने रुग्णाला दाखल करुन घेतल्याचे रजिस्टर आणि मृत्यूचे प्रमाणपत्रही सादर केले आहे.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.