Eknath Shinde : सरकार धोक्यात? या प्रश्नावर रोहित पवारांचं मोठं विधान, म्हणतात…ते

| Updated on: Jun 21, 2022 | 12:16 PM

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला आहेत. शिवसेना नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde : सरकार धोक्यात? या प्रश्नावर रोहित पवारांचं मोठं विधान, म्हणतात...ते
रोहित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या (shivsena) गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यांशी संपर्क झाला असून, राज्यात राजकीय भूकंप वगैरे काही येणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही जोडण्याचे काम करतो मात्र काही जण तोडण्याचे काम करतात असे म्हणत त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या सोबत आहोत, ते जसे म्हणतील तसं करू असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले रोहीत पवार ?

शिवसेनेत फूट पडल्यास भाजप अविश्वासाचा ठराव आणू शकते याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही जोडण्याचे काम करतो. ते तोडण्याचे काम करतात. पाहुयात कोण जिंकतं ते. आम्ही आमच्या नेत्यांसोबत आहोत, आमचे नेते जो आदेश देतील तसं आम्ही करू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

राऊत काय म्हणाले?

एकनाथ  शिंदे काल सायंकाळापासून सुरतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र हा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. हे खरे  आहे की, आमचे काही आमदार आमच्या संपर्कात नाहीत. मात्र आमचा एकनाथ शिंदे यांच्यासी संपर्क झाला आहे. राज्यात भूकंप वगैरे काही येणार नाही. मुख्यमंत्री प्रत्येक विभागाचा आढावा घेत असतात. जर त्यातून काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू. भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा शिवसेनेच्या पाठीत केला गेलेला वार आहे. शिवसेनेवर वार म्हणजेच तो म्हराष्ट्रावर वार आहे.