प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही, ते मुद्दाम अडकतायत का? : संदीप देशपांडे

| Updated on: Sep 05, 2020 | 11:10 AM

शिवसेना लोकांच्या त्रासावरील लक्ष हटवण्यासाठी मुद्दाम कंगनाच्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकत आहे का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय (Sandeep Deshpande on Politics over Kangana Ranaut).

प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही, ते मुद्दाम अडकतायत का? : संदीप देशपांडे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करण्याचा आरोप केलाय. कुणीतरी प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. तरीही शिवसेना लोकांच्या त्रासावरील लक्ष हटवण्यासाठी मुद्दाम कंगनाच्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय (Sandeep Deshpande on Politics over Kangana Ranaut).

संदीप देशपांडे म्हणाले, “भाविकांच्या मंदिरात प्रवेशाला बंदी, लाखो लोक बेरोजगार आहेत, आरोग्य व्यवस्था चांगली नसल्याने हजारो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून काम करत असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. रेल्वेसेवा चालू नसल्यामुळे लोकांचे प्रवासाचे भयंकर हाल होत आहेत. या सर्व परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का? यावर विचार करायला हवा.”

“ज्या व्यक्तीची 5 पैशांची किंमत नाही अशी व्यक्ती काही वादग्रस्त वक्तव्य करत प्रसिद्धीसाठी जाळं फेकत आहे. यात जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. तरीही शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकते आहे का? यामागे इतर सर्व विषयांवरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे का? लोकांना होणाऱ्या त्रासावरुन लक्ष हटवून या विषयावर लक्ष केंद्रीत करण्याचं हे षडयंत्र तर नाही ना याचा विचार माध्यमांनी आणि जनतेने करायला हवा,” असं संदीप देशपांडे म्हणाले.


“मागील 2 महिन्यात एक हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिनीचा संपादक याच शिवसेनेचे वाभाडे काढत असताना आख्खी शिवसेना गप्प होती. मग आत्ताच या सगळ्याचा उद्रेक का होतोय याचा नक्की विचार करायला हवा. या षडयंत्रामध्ये कोणकोण आहे याचाही विचार करायला हवा. आपण सर्वजण सुज्ञ आहात याचा विचार नक्की करा”, असंही संदीप देशपांडे यांनी नमूद केलं.


दरम्यान, याआधी “दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही अभिनेत्री कंगना रनौतची एक विकृतीच आहे. या विकृतीमागे कुणाचं डोकं आहे हेही आम्हाला नीट माहिती आहे. एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं, असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे”, अशी टीका मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे. कंगनाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, अशीदेखील भूमिका अमेय खोपकर यांनी ट्विटरवर मांडली आहे.

“कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सूक आहेत, असं कुणाला वाटत असेलही, पण कुणाला किती महत्त्व द्यायचं, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला शिकवलेलं आहे”, असं अमेय खोपकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं

Sandeep Deshpande on Politics over Kangana Ranaut