AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : एक दोन पळून गेले म्हणून काय शिवसेना संपत नाही; हा फक्त धुराळा, राऊतांचा पुन्हा बंडखोरांना टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. एक दोन पळून गेले म्हणून काही फरक पडत नाही. शिवसेना पुन्हा उभी राहील असे राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : एक दोन पळून गेले म्हणून काय शिवसेना संपत नाही; हा फक्त धुराळा, राऊतांचा पुन्हा बंडखोरांना टोला
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 08, 2022 | 1:21 PM
Share

मुंबई : शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये (Nashik) जोरदार फटकेबाजी करत बंडखोर आमदारांचा समाचार घेतला आहे. शिवसेना जागेवरच आहे. एक, दोन लोक पळून घेले म्हणजे शिवसेना संपली असे म्हणता येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेत झालेली बंडखोरी हे कृत्रिम वादळ आहे, ही वावटळ दूर होईल शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहील असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला काहीही फरक पडला नाही. मालेगाव, नांदगाव इथले कार्यकर्ते मला भेटून गेले. नाशिक महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येईल. मात्र ज्यांनी शिवसेना सोडली ते परत कधीही निवडून येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी नव्या सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ही सत्ता कायदेशीररित्या स्थापन झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडेच

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र दुसरीकडे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेकडेच राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसैनिकांना शिवसेनेमुळे चांगले दिवस आले. मात्र त्यांना शिवसैनिकांना संपवायचे आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. भाजपावाले माझ्यबद्दल बोलत नाहीत. मात्र हे 40 बंडखोर बोलत आहेत. ते रोज वेगळ काहीतरी बोलत आहेत. शिवसेना का सोडली तर त्याचे दररोज एक नवे कारण देत आहेत. आतापर्यंत चार कारणे दिली. उद्या पाचवे कारण देतील असे राऊत यांनी म्हटले आहे.

नाशिक महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येणार

शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना शिवसैनिकांना संपवायचे आहे. शिवसेनेमुळे शिवसैनिकांना चांगले दिवस आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच नाशिकमध्ये शिवसेना स्थिर आहे. इथे काहीही फरक पडला नसून, महापालिकेत  शिवसेनेची सत्ता येईल असेही राऊत यांनी म्हटले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.