रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

| Updated on: Jul 26, 2020 | 8:06 AM

"अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर मतं मागणं आता तरी थांबवा", असं संजय राऊत म्हणाले Sanjay Raut slams BJP).

रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
Follow us on

मुंबई : “अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर मतं मागणं आता तरी थांबवा. रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका”, असा घणाघात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरात केला आहे (Sanjay Raut slams BJP). अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली.

“राममंदिर जन्मभूमीचे राजकारण सदैव सुरुच राहिले. ते 5 ऑगस्टला तरी कायमचे संपावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्राकांड घडले. अयोध्येतून निघालेली साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्थानकावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही गाडी पेटवण्यात आली, या संशयातून गुजरातमध्ये जो दंगा झाला तो सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असाच होता. या दंगलीने मोदी यांना आधी हिंदूंचे नेते आणि नंतर पंतप्रधान केले. म्हणजे या राजकीय चढाओढीतही राम आहेच”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“गुजरातमध्ये गोध्राकांड घडले नसते तर आजच्या मोदींचे स्थान आणि रुप आपल्याला पाहता आले नसते. अयोध्येनंतरच्या दंगलीने शिवसेना-भाजप युतीला सत्ता प्राप्त झाली. मुंबईसह महाराष्ट्रात तेव्हा हिंदुत्वाची लाट उसळली. तसे साबरमती एक्सप्रेसच्या गोध्राकांडानंतर पंतप्रधान मोदी हे हिंदुत्ववादी नेते म्हणून पक्के झाले”, असं संजय राऊत म्हणाले.

“छत्रपती शिवाजीराजे आणि प्रभू श्रीराम या दोन विभूतींच्या नावाने जितके राजकारण गेल्या 30 वर्षांत झाले ते पाहिले की, आपण आजही श्रद्धा आणि भावनेच्या विषयांतच गुंतून पडलो आहोत याची खात्री पटते”, असंदेखील संजय राऊत म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“अयोध्या समस्या ही या देशापुढील जणू एकमेव समस्या बनली होती. सर्वांची शक्ती, वृत्तपत्रांचे रकाने त्यात खर्ची होत होते. ते आता थांबले. हे सर्व पंतप्रधान म्हणून मोदींच्या कारकीर्दीत घडले. पंतप्रधान पाकिस्तान, चीनच्या सीमेचा वाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला. त्याचे श्रेय न्यायालयाला द्यावे लागेल”, असं संजय राऊत म्हणाले.

“राम मंदिर 28 वर्षांनी उभे राहील. या लढ्याने शरयू लाल झाली. शेवटी ज्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराचा निकाल दिला ते मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई भगवे झाले आणि राज्यसभेत पोहोचले”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन दहा दिवसांवर, नागपुरातून पवित्र माती आणि पाणी रवाना