राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

| Updated on: May 26, 2020 | 9:20 AM

कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे. (Sharad Pawar visits Matoshree for meeting with CM Uddhav Thackeray and Sanjay Raut)

राज्यपालांच्या भेटीनंतर पवार मातोश्रीवर, उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा
Follow us on

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘मातोश्री’वर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत पवारांची गुप्त चर्चा झाली. राज्य सरकारविषयी असलेली नाराजी पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे. (Sharad Pawar visits Matoshree for meeting with CM Uddhav Thackeray and Sanjay Raut)

राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका भाजप नेते वारंवार करत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कालच राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे.

हेही वाचा : राज्यपालांच्या भेटीसाठी पवार राजभवनावर, पटेल म्हणतात कोश्यारींनी चहासाठी बोलावलं

शरद पवार यांनी लॉकडाऊन उठवून अर्थचक्र सुरु करण्यासाठी साखर उद्योग, कृषी उद्योगाला चालना देण्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत तात्काळ लॉकडाऊन उठवला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेसाठी पवार ‘मातोश्री’ची पायरी चढले असावेत, असाही कयास व्यक्त केला जात आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील खदखद व्यक्त होत असल्याची चर्चा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला देणं किंवा महाविकास आघाडी तोडण्याची हीच वेळ असल्याचं सुचवणे, हे याचेच द्योतक मानले जाते.

पाहा व्हिडिओ :

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

राज्यपालांच्या भेटीसाठी पवार राजभवनावर, पटेल म्हणतात कोश्यारींनी चहासाठी बोलावलं

गुजरात आणि गोव्यात एक भूमिका, पण महाराष्ट्रात विरुद्ध भूमिका का? शिवसेनेचा ‘सामना’तून राज्यपालांना सवाल

राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार, कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?

…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत

उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादी उद्ध्वस्त करेल, महाविकास आघाडी तोडण्याची हीच ती वेळ : स्वामी

(Sharad Pawar visits Matoshree for meeting with CM Uddhav Thackeray and Sanjay Raut)