Shiv Sena : तीन आमदार, एक खासदार तरीही भाजपने वरळीतील मैदान मारलं; शिवसेनेकडून नेत्यांची कानउघाडणी

| Updated on: Aug 17, 2022 | 2:03 PM

Shiv Sena : वरळी जांबोरी मैदानात मुंबई भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाचे प्रकरण शिवसेना अंतर्गत तापले आहे. काल सायंकाळी वरळीतील शिवसेना नेत्यांना शिवसेना भवनात बोलवण्यात आले होते.

Shiv Sena : तीन आमदार, एक खासदार तरीही भाजपने वरळीतील मैदान मारलं; शिवसेनेकडून नेत्यांची कानउघाडणी
तीन आमदार, एक खासदार तरीही भाजपने वरळीतील मैदान मारलं; शिवसेनेकडून नेत्यांची कानउघाडणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: वरळीतील जांबोरी मैदानावर भाजपने (bjp) दहीहंडी उत्सवाचे आयोजन केलं आहे. दरवर्षी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर या मैदानावर दहीहंडीचं आयोजन करत असतात. मात्र, पहिल्यांदाच भाजपने आता हे मैदान मिळवल्याने शिवसेनेत (shivsena) अस्वस्थता निर्माण झाली आहे. वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहेत. एक खासदार आहे. माजी महापौर याच परिसरात राहतात. तरीही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळवता आलं नाही. त्याची दखल शिवसेना नेतृत्वाने घेतली असून शिवसेना नेत्यांची कान उघाडणी केली आहे. शिवसेनेचे खासदार आणि सचिव अनिल देसाई (anil desai) यांनी या नेत्यांची कानउघाडणी केली आहे. मैदान खराब होऊ नये म्हणून हे मैदान घेतलं नसल्याचं कारण या नेत्यांनी दिलं आहे. मात्र, महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने आणि थेट आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच भाजपने हा उत्सव आयोजित केल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वरळी जांबोरी मैदानात मुंबई भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाचे प्रकरण शिवसेना अंतर्गत तापले आहे. काल सायंकाळी वरळीतील शिवसेना नेत्यांना शिवसेना भवनात बोलवण्यात आले होते. यावेळी जांबोरी मैदानात पक्षाचा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी दाखवलेल्या उदासीनतेबद्दल पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यंदा आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदार संघात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात मुंबई भाजपने बाजी मारली आहे. मोक्याचे जांबोरी मैदान दहीहंडी उत्सवासाठी पटकावल्याने शिवसेनेवर नामुष्की ओढावली आहे. त्यामुळेच शिवसेना नेत्यांची ही कानउघाडणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

शाखा प्रमुखांची आज बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराची हंडी वरळीतून फुटणार आहे. नवनियुक्त मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरळीत भव्य दहीहंडी आयोजित करून शिवसेनेला डिवचले आहे. दरम्यान, स्थानिक शिवसेना नेत्यांच्या कानउघाडणी नंतर वरळीत काल रात्री शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. आज सायंकाळीही वरळीत शाखाप्रमुखांची बैठक होणार आहे. यात नव्या जागेचा शोध घेणे आणि भाजपपेक्षाही मोठी दहीहंडी करण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शेलारांचं डिवचणं सुरूच

दरम्यान, दहीहंडी उत्सवावरून आशिष शेलार यांचं शिवसेनेला डिवचणं सुरूच आहे. आम्ही शिवसेनेचा गड वगैरे मानत नाही. आदित्य ठाकरे हे युतीतून निवडून आले होते. त्यामुळे गड वगैरेवर आमचा विश्वास नाही. कुणी गड ठरवला? कुणी अधिकार दिला? शेलारमामांशिवाय गड कोण ठरवू शकतो? असा सवाल करतानाच जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेला डिवचले आहे.