AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

आजही नाणारमधील अनेक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस करावं. | Vinayak Raut

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीतही नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्पाच्याविरोधात कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत रिफायनरी समर्थकांना अवघी दोन ते तीन मते पडली.
| Updated on: Mar 07, 2021 | 12:44 PM
Share

मुंबई: काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नाणार तेलशुद्धीकरण (Nanar Project) प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उपस्थित केला. नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या हितासाठी त्यांनी ही मागणी केली आहे, याची मला कल्पना नसल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले. (Shivsena leader Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)

नाणार प्रकल्पासंदर्भात पुनर्विचार करावा, असे पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या नाणारविषयी बदललेल्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. आजही नाणारमधील अनेक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस करावं, असे आव्हान विनायक राऊत यांनी दिले.

तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीतही नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्पाच्याविरोधात कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत रिफायनरी समर्थकांना अवघी दोन ते तीन मते पडली. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा स्पष्ट विरोध आहे, हे दिसत असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

राज ठाकरेंनी पत्रात नेमंक काय म्हटलंय?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

मनसे सहकार्य करणार, आराखडाही देणार

सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील ‘या’ शहरात इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक

‘जनता महाविकासआघाडीच्या कामावर समाधानी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य’

Geranium Farming| नांदेडच्या युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, जिरेनियम शेतीद्वारे लाखोंची कमाई

LIVE | ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ प्रकल्पाचा विचार करा; राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

(Shivsena leader Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.