AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : त्यांची कितीही कुळे उतरली तरी शिवसेना नष्ट करू शकणार नाही, उद्धव ठाकरेंची बावनकुळेंवर टीका

भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते लोकशाहीला घातक आहे की नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री आहे.

Uddhav Thackeray : त्यांची कितीही कुळे उतरली तरी शिवसेना नष्ट करू शकणार नाही, उद्धव ठाकरेंची बावनकुळेंवर टीका
| Updated on: Aug 13, 2022 | 8:09 PM
Share

मुंबई : मध्यंतरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (National President) जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत चालली, असं म्हटलं होतं. त्यावर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्यांनी प्रदेशाध्यक्ष (State President) केलं. त्यांच्या नावात किती कुळे आहेत माहीत नाही. पण त्यांची किती जरी कुळं उतरली तरी ते शिवसेना नष्ट करू शकत नाही. मग ते 52 असतील किंवा 152 असतील. मला काही फरक नाही पडत. प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचं, हे लोकशाहीला (Democracy) घातक असल्याचं ठाकरे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष केले. ते महाराष्ट्र भाजपमय करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी शिवसेना काही संपणार नाही. मग, कितीही कुळे उतरवलीत, तरी चालेल. असंही ठाकरे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली.

येणं जाणं सुरूच राहते

भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते लोकशाहीला घातक आहे की नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री आहे. उद्या पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे. हे येणं जाणं सुरूच असतं. पण नड्डा जे बोलले या देशात एकच पक्ष राहणार आहे. बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. विशेषता शिवसेना संपत चालली आहे. बघू, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

शिवसेनेची पाळंमुळं 62 वर्षांपासून

मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणाचा ओढा कायम राहिला आहे. व्यंगचित्रकार काय असतो. तो काय करू शकतो याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मराठी माणूस आणि हिंदूचं काय झालं असतं हे लक्षात येतं. शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं. मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला. मी का सांगतोय तर काही लोकांना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे. कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमुळं 62 वर्षांपासून आहेत. त्या आधीपासून माझ्या आजोबांनी विचारांची पेरणी केली होती. याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.