AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमुक्त कोल्हापूरला शिवसेना जबाबदार : चंद्रकांत पाटील

एकट्या कोल्हापुरात तब्बल 7 जागांवर युतीला फटका बसला. मात्र, याला शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला आहे

भाजपमुक्त कोल्हापूरला शिवसेना जबाबदार : चंद्रकांत पाटील
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 28, 2019 | 11:07 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूरमुळे सध्या शिवसेना-भाजपमध्ये खटके उडू लागले आहेत (BJP-Shivsena). त्याचं कारण म्हणजे भाजपमुक्त झालेला कोल्हापूर जिल्हा. 2014 मध्ये ज्या शिवसेना-भाजपने कोल्हापुरातल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकल्या होत्या (Kolhapur Vidhansabha Results). त्या युतीला यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये फक्त 1 जागा मिळवता आली. म्हणजे एकट्या कोल्हापुरात तब्बल 7 जागांवर युतीला फटका बसला. मात्र, याला शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला आहे (Chnadrakant Patil on Sanjay Mandlik).

लोकसभेला काँग्रेसच्या सतेज पाटलांनी खुलेआम शिवसेनेच्या संजय मंडलिकांचा प्रचार केला (Chnadrakant Patil on Sanjay Mandlik). त्याचीच परतफेड संजय मंडलिकांनी विधानसभेला केली. पण, मंडलिकांनी फक्त कोल्हापूर दक्षिणमध्येच नव्हे तर चंदगड, कागल अशा अनेक ठिकाणी आघाडीला मदत केल्याचा आरोप आहे. मात्र मंडलिकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

2014 मध्ये इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिणची जागा भाजपकडे होती. मात्र, यंदा दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. गटबाजी आणि पुराचा फटका या दोन्ही कारणांमुळे भाजपचा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याची चर्चा आहे. मात्र, चंद्रकांत पाटील युतीधर्मावरुन शिवसेनेला इशारा देत आहेत.

शिवसेनेलाही यंदा फक्त राधानगरीची जागा राखता आली. ज्या कोल्हापूरने गेल्या निवडणुकीत 10 पैकी 8 जागा, कोल्हापुरातले दोन्ही खासदार शिवसेनेच्या पारड्यात टाकले. त्या शिवसेनेने कोल्हापूरला एकही आमदार दिला नाही. त्यात स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभावही शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

ज्या चंद्रकांत पाटलांनी आघाडीचे डझनभर नेते भाजपात आणले, त्यांना स्वतःचाच जिल्हा राखता आला नाही. इतकंच काय, तर खुद्द त्यांनाच कोथरुडमधू निवडणूक लढवावी लागली. 2014 मध्ये स्वतंत्र लढून जिंकलेल्या जागा यंदा भाजप का जिंकू शकली नाही, यावर आता चंद्रकांत पाटील आणि भाजपने विचार करायची गरज आहे.

Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.