AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेर नगरी चौपट राजा, सोनिया गांधी मोदी सरकारवर कडाडल्या

काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी करण्यात आली, तो काळा पैसा आलाच नाही, अशी टीका सोनिया गांधी यांनी रामलीला मैदानात काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीदरम्यान केली

अंधेर नगरी चौपट राजा, सोनिया गांधी मोदी सरकारवर कडाडल्या
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 14, 2019 | 3:41 PM
Share

नवी दिल्ली : देशात ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असं वातावरण असल्याची टीका काँग्रसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बचाओ रॅली’त त्या बोलत होत्या. ‘सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? असा सवालही सोनिया गांधींनी (Sonia Gandhi in Bharat Bachao Rally) विचारला.

‘देश वाचवायचा असेल, तर कठोर संघर्ष करावा लागेल. देशात बेरोजगारीचं वातावरण आहे. युवकांना नोकरीसाठी दारोदार हिंडावं लागत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना शेतीसाठी नवीन सुविधा मिळत नाहीत. देशात ‘अंधेर नगरी चौपट राजा’सारखं वातावरण आहे. सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? असं अख्खा देश विचारत आहे. काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी करण्यात आली, तो काळा पैसा आलाच नाही. याचा तपास व्हायला हवा की नाही?’ असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला.

‘सध्याचं वातावरण असं आहे, की मनात आलं आणि कलम बदलले, राज्याचा दर्जा बदलला, राष्ट्रपती राजवट हटवा किंवा कोणतंही विधेयक पारित करा. दैनंदिन वस्तूंच्या किमतींनी मर्यादा ओलांडल्या आहेत. देशातील युवकांसमोर अंधःकार आहे. चुकीच्या धोरणांमुळे कामधंदे संपुष्टात आले. कंपन्या कोणाला आणि का विकल्या जात आहेत?’ असा सवालही सोनिया गांधींनी उपस्थित केला.

मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे : राहुल गांधी

‘या लोकांनी आणलेला नागरिकत्व कायदा आसाम आणि ईशान्येकडील राज्याप्रमाणे भारताचा आत्मा टराटरा फाडेल. हे लोक संविधानाचे पालन करण्याचा दिखावा करतात आणि दररोज संविधानाची वाट लावतात’, असा घणाघातही सोनिया गांधी (Sonia Gandhi in Bharat Bachao Rally) यांनी केला.

मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात ‘मेक इन इंडिया’ नसून ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा भाजपकडून लोकसभेत निषेध करण्यात आला होता. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली होती. यावर राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं.

Follow Us
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती