AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांनी मिमिक्री केली त्यांनाच डिनरला बोलावले, त्या खासदाराने मानले उपसभापतींचे आभार

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनखड़ यांच्या त्या मिमिक्रीला कलेचा प्रकार म्हटले होते. असे आपण हजारोवेळा करत राहू आणि तसे करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते.

ज्यांनी मिमिक्री केली त्यांनाच डिनरला बोलावले, त्या खासदाराने मानले उपसभापतींचे आभार
kalyan mukharji and Jagdeep DhankharImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 04, 2024 | 10:19 PM
Share

मुंबई | 04 जानेवारी 2024 : संसदेत दोन तरुणांनी घुसून स्मोक जेल कांडी फोडल्या होत्या. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्या घटनेचा निषेध करताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड़ यांची मिमिक्री केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या फोनवर हे सर्व रेकॉर्ड केले होते. या प्रकारामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. तर उपसभापती जगदीप धनखड़ यांनी या घटनेमुळे आपण खूपच व्यथित झाल्याचे सांगितले होते.

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनखड़ यांच्या त्या मिमिक्रीला कलेचा प्रकार म्हटले होते. असे आपण हजारोवेळा करत राहू आणि तसे करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. तर, उपसभापती जगदीप धनखड़ यांनी सर्व अपमान सहन करूनही, सेवा मार्गापासून कधीही विचलित होणार नाही. तसेच, इतरांच्या विचारांना स्थान दिले पाहिजे, असे म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान, उपसभापती जगदीप धनखड़ यांनी ज्या खासदारांनी त्यांची मिमिक्री केली होती त्या तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना डीनरचे आमंत्रण दिले आहे. निमित्त होते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या वाढदिवसाचे… उपसभापती धनखड़ यांनी कल्याण मुखर्जी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेछ्या देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच, कुटुंबियांसह त्यांना जेवायला बोलावले.

खासदार कल्याण मुखर्जी यांनी याबद्दल उपसभापती जगदीप धनखड़ यांचे एक्सवर आभार मानले आहेत. राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड़ यांनी मोठे मन दाखवत शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, राज्यसभेच्या उपसभापती यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जेवायला बोलावले आहे. बॅनर्जी यांनी X वर पुढे असे लिहिले आहे की, ‘माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल मी माननीय उपराष्ट्रपतींचे आभार मानतो. त्यांनी माझ्या पत्नीशी वैयक्तिकरित्या टेलिफोनवर बोलून माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद दिल्याने मी भारावून गेलो आहे.

मिमिक्रीच्या त्या घटनेबद्दल अनेक सदस्यांनी कल्याण मुखर्जी यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी जगदीप धनखड़ हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्याच काळात त्यांचे आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते यांच्यातील संबंध बिघडले होते. त्याचमुळे कल्याण मुखर्जी यांनी निमित साधून त्यांची मिमिक्री केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, जगदीप धनखड़ यांच्या या कृतीची आता देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.