AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant : रिक्षावाला पानवाला यांच्यासाठी शिंदे गट नव्या योजना राबिवणार, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला

आमदारांनी शिवसेना का सोडली यांची सुद्धा कारणे रामदास कदम यांनी सांगितली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली.

Uday Samant : रिक्षावाला पानवाला यांच्यासाठी शिंदे गट नव्या योजना राबिवणार, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला
रिक्षावाला पानवाला यांच्यासाठी शिंदे गट नव्या योजना राबिवणार, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोलाImage Credit source: tv9marathi
| Updated on: Jul 19, 2022 | 4:36 PM
Share

मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय घडामोडी अत्यंत जलदगतीने घडत आहेत. त्यामुळे रोज कायतरी नवीन कानावर पडतं आहे. आज देखील राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आज रामदाम कदम यांनी माध्यमांच्या समोर त्यांची व्यथा मांडली. शिंदे गटाचा उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) गटाला मास्टर स्ट्रोक मारला आहे. रिक्षावाला, पानवाला , वेश्या अशा शब्दात शिवसेना नेत्यांकडून टीका सोसल्या यांचं घटकासाठी योजना राबविणार असल्याचं शिंदे गटाने जाहीर केलं आहे. रिक्षा चालकांसाठी रिक्षा चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले जाणार आहे. पानपट्टी वाला आणि वोचमन आणि शरीर विक्री करणाऱ्या करणाऱ्या अशा घटकासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.

आमदारांनी शिवसेना का सोडली

आमदारांनी शिवसेना का सोडली यांची सुद्धा कारणे रामदास कदम यांनी सांगितली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली. त्यावेळी रामदास कदम यांनी त्यांच्याबाबत जे घडल त्या व्यथा मांडल्या आहेत. सुप्रीम कोर्टबाबत असं वक्तव्य कुणी करू नये, संजय राऊत यांनी टीका केली म्हणून मी त्यावर काही बोलणार नाही. या सर्व वक्तव्याचा परिपाक आजची रामदास कदम यांची मुलाखत आहे असही उदय सामंत यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत

रामदास कदम यांनी त्यांच्याबाबत जे घडलं ते मीडियासमोर मांडलं आहे. सुप्रीम कोर्टबाबत असं वक्तव्य कुणी करू नये असं म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना टोला लगावला. संजय राऊत यांनी टीका केली म्हणून मी त्यांना उत्तर देणार नाही. या सर्व वक्तव्याचा परिपाक आजची रामदास कदम यांची मुलाखत आहे. किरण साळी यांना बढती देण्यात आली आहे . एकनाथ शिंदे कुणाची हकालपट्टी करत नाही तर बढती देण्याचे काम करत आहेत असा टोला सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 12 खासदारांनी जी भूमिका घेतली ती आम्ही आमदारांनी देखील घेतली. आमदारांनी शिंदे यांची खऱ्या शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका स्वीकारली आहे.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.