Astrology: कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे, ‘या’ उपायांनी मिळेल लाभ

| Updated on: Jul 21, 2022 | 4:00 PM

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. ग्रहांचा प्रभाव सर्वच बारा राशींवर होतो. एखाद्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव लाभदायक तर एखाद्यसाठी तो हानिकारक असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे कुंडलीतील ग्रहांची मजबूत स्थिती माणसाच्या जीवनात यश आणि सुख-समृद्धीचे कारण असते, तिथे ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे असे मानले जाते की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर […]

Astrology: कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे, या उपायांनी मिळेल लाभ
Follow us on

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. ग्रहांचा प्रभाव सर्वच बारा राशींवर होतो. एखाद्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव लाभदायक तर एखाद्यसाठी तो हानिकारक असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे कुंडलीतील ग्रहांची मजबूत स्थिती माणसाच्या जीवनात यश आणि सुख-समृद्धीचे कारण असते, तिथे ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे असे मानले जाते की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, वाणीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे, तर कानांवर शनि आणि मंगळ ग्रहाचे राज्य आहे. अशा स्थितीत संबंधित ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अवयवांशी संबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया कमजोर शुक्रामुळे कोणते रोग होतात आणि त्यासंबंधीचे उपाय.

कमजोर शुक्र आणि आरोग्य

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर त्याला डायबिटीज, अंगठ्याचा त्रास, त्वचा, डोळे आणि गुप्तांगांशी संबंधित आजार होतात. चला तर मग जाणून घेऊया कुंडलीत कमजोर असलेल्या शुक्राला कसे ठीक करावे.

या उपायांनी होईल लाभ

  1. ज्योतिषशास्त्रानुसार, दररोज आपल्या अन्नातील काही भाग नैवेद्य म्हणून गायीसाठी काढला पाहिजे. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो.
  2. ज्वारी किंवा अन्नधान्य दान करून, गरीब मुले किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून शुक्र ग्रह देखील शांत होतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील कमजोर शुक्र शांत होण्यासाठी चांदी, कापूर, तांदूळ किंवा कोणत्याही पांढर्‍या रंगाचे फुले दान करणे डायबिटीजच्या रुग्णांना लाभदायक ठरू शकते.
  5. मुलींना अन्नदान करून आशिर्वाद घेऊन लग्न केले तर पत्नीला सुखी ठेवल्यास हा आजार लवकर बरा होतो असाही विश्वास आहे.
  6. शुक्रवारी शुभ्र वस्त्र, दूध, दही इत्यादी शुभ्र वस्तूंचे दान केल्यानेही शुक्रदेव प्रसन्न होतात. याशिवाय दर शुक्रवारी पांढऱ्या गाईला किंवा बैलाला चारा खायला दिल्यास सकारात्मक परिणाम मिळतात असे मानले जाते.