Grah Gochar : रेवती नक्षत्रात गुरु आणि बुधाची युती, मार्च महिन्याच्या शेवटी या राशींना अच्छे दिन

ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतात. त्यामुळे नक्षत्र गोचराचा काही राशींवर शुभ तर अशुभ परिणाम होतो. चला जाणून घेऊयात रेवती नक्षत्रातील गुरु आणि बुधाची युती

Grah Gochar : रेवती नक्षत्रात गुरु आणि बुधाची युती, मार्च महिन्याच्या शेवटी या राशींना अच्छे दिन
Grah Gochar : रेवती नक्षत्रात गुरु आणि बुधाची युती, मार्च महिन्याच्या शेवटी या राशींना अच्छे दिन
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 10:12 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह आणि पाप ग्रह अशी वर्गवारी करण्यात आली आहे. गुरु आणि बुध ग्रह यांची वर्णी शुभ ग्रहात येते. त्यामुळे या दोन ग्रहांची शुभ मानली जाते.ग्रह राशीसोबत नक्षत्रात गोचर करत असतात. गुरु ग्रहाने रेवती नक्षत्रात गोचर केलं आहे. या नक्षत्रावर बुध ग्रहाचं अधिपत्या मानलं जातं. आता दोन्ही ग्रहांची रेवती नक्षत्रात युती होणार आहे. बुध ग्रह या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ज्ञानकारक गुरु आणि बुद्धीदाता बुध ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे काही जातकांना शुभ फळं मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत.

या पाच राशींना होणार फायदा

  • मेष – या राशीच्या जातकांना रेवती नक्षत्रातील गुरु-बुध युती फलदायी ठरणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होऊ शकतो. नवनवे आर्थिक स्त्रोत खुले होतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
  • मिथुन – गुरु आणि बुध युतीमुळे या राशीच्या जातकांना करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल आणि पदोन्नती मिळू शकते. वाहन, जमीन खरेदीचा योग जुळून येईल.
  • वृश्चिक – बुध आणि गुरुच्या युतीमुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. उत्पन्नात वाढ झाल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी बॉसकडून कौतुकाची थाप पडेल.
  • धनु – या राशीच्या जातकांना नोकरीची नवी संधी चालून येईल. नोकरी बदलण्यासाठी हा काळ उत्तम राहील. करिअरमध्ये नवी उंची गाठण्यासाठी बळ मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदीसाठी उत्तम काळ आहे.
  • कुंभ –या राशीच्या जातकांनाही बुध गुरु चांगली फळं देतील. पण शिक्षणक्षेत्रात असलेल्या जातकांना सर्वाधिक फायदा होईल. कारण या काळात वाणी जबरदस्त होईल. त्याचबरोबर व्यवसायिकांना फायदा होईल.

नक्षत्र

1.आश्विन, 2.भरणी, 3.कृतिका, 4.रोहिणी, 5.मृगशिरा, 6.आर्द्रा 7.पुनर्वसु, 8.पुष्य, 9.आश्लेषा, 10.मघा, 11.पूर्वा फाल्गुनी, 12.उत्तरा फाल्गुनी, 13.हस्त, 14.चित्रा, 15.स्वाति, 16.विशाखा, 17.अनुराधा, 18.ज्येष्ठा, 19.मूल, 20.पूर्वाषाढा, 21.उत्तराषाढा, 22.श्रवण, 23.धनिष्ठा, 24.शतभिषा, 25.पूर्वा भाद्रपद, 26.उत्तरा भाद्रपद आणि 27.रेवती

नक्षत्र स्वामी

  • केतु:- आश्विन, मघा, मूल
  • शुक्र:- भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा
  • रवि:- कार्तिक, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा
  • चन्द्र:- रोहिणी, हस्त, श्रवण
  • मंगल:- मृगशिरा, चित्रा, धनिष्ठा
  • राहु:- आर्द्रा, स्वाति, शतभिषा
  • बृहस्पति:- पुनर्वसु, विशाखा, पूर्वा भाद्रपद
  • शनि:- पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपद
  • बुध:- आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.