AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मीठाच्या पाण्याने घराला पोछा मारल्यास नकारात्मक उर्जा होते दूर, हे सोपे उपाय अवश्य करा

Vastu Tips Marathi आपल्या दैनंदिन जीवनात मीठाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मीठा शिवाय स्वयंपाक हा अपूर्ण आहे. ज्योतिषशास्त्रात आणि वास्तूशास्त्रातही मीठाला विशेष महत्त्व आहे. घरात नकारात्मक उर्जा जाणवत असल्यास मीठाच्या पाण्याने पोछा मारावा. याशिवाय आणखीही काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips : मीठाच्या पाण्याने घराला पोछा मारल्यास नकारात्मक उर्जा होते दूर, हे सोपे उपाय अवश्य करा
वास्तूशास्त्राचे उपाय Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 21, 2023 | 8:04 AM
Share

मुंबई : प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात मीठ अवश्य असते. आपण त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो. मीठाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सागरी मीठ आणि पर्वतीय मीठ यामध्ये प्रमुख आहेत. पर्वतीय मीठाला रॉक मीठ म्हणतात. उपवासाच्या वेळी याचा भरपूर वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की मिठाचे विशेष महत्व ज्योतिषशास्त्रात (Salt Importance in Astrology) आणि वास्तूशास्त्रात देखील सांगण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रात मीठाचा संबंध शुक्र आणि चंद्राशी आहे. मिठाचे अनेक चमत्कारिक उपयोग ज्योतिष शास्त्रात आणि वास्तूशास्त्रात सांगितले आहेत. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया या उपायांबद्दल.

ज्योतिषशास्त्रात मिठाचा वापर

ज्योतिषांच्या मते जर पत्रिकेत चंद्र कमजोर असेल तर समुद्री मीठाचा वापर करू नये. अशा स्थितीत खडे मीठ फायदेशीर ठरते. त्याचबरोबर जर मंगळ कमजोर असेल तर समुद्री मीठाचा वापर फायदेशीर ठरतो. घरात मीठाच्या डब्यात लवंग ठेवणे देखील शुभ मानले जाते. यामुळे सुख-समृद्धी टिकून राहते. मिठाच्या पाण्याने घर पुसणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि संपत्ती वाढते.

मिठाचे 5 चमत्कारिक उपयोग

ज्योतिषी सांगतात की मन अस्वस्थ असेल तर मिठाच्या पाण्याने स्नान करावे. खोलीच्या कोपऱ्यात मिठाचा तुकडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वाईट दृष्टीचा त्रास होत असल्यास डोक्यावर मीठ शिंपडून ते वाहत्या पाण्यात टाकावे. जर तुम्ही दीर्घकाळ आजारी असाल तर तुमच्या पलंगाच्या शेजारी काचेच्या डब्यात मीठ ठेवल्यास फायदा होतो. हे एका आठवड्यात बदलले पाहिजे. जर शुक्र समस्या देत असेल तर मीठ दान करणे खूप फायदेशीर आहे.

मीठ वापरताना ही खबरदारी घ्या

मीठ नेहमी काचेच्या डब्यात ठेवावे. मीठ अजिबात वाया घालवू नका. जमिनीवर टाकू नका. मीठ थेट कोणत्याही व्यक्तीच्या हातात देऊ नका, अन्यथा नातेसंबंधात कडवटपणा निर्माण होऊ शकतो.मीठ कोणालाही उसणे मागू नये. सक्तीने किंवा दबावाखाली कोणाकडूनच मीठ स्वीकारू नये. घरात मीठाचा अतिरिक्त साठा ठेवावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.