AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मीठाच्या पाण्याने घराला पोछा मारल्यास नकारात्मक उर्जा होते दूर, हे सोपे उपाय अवश्य करा

Vastu Tips Marathi आपल्या दैनंदिन जीवनात मीठाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मीठा शिवाय स्वयंपाक हा अपूर्ण आहे. ज्योतिषशास्त्रात आणि वास्तूशास्त्रातही मीठाला विशेष महत्त्व आहे. घरात नकारात्मक उर्जा जाणवत असल्यास मीठाच्या पाण्याने पोछा मारावा. याशिवाय आणखीही काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips : मीठाच्या पाण्याने घराला पोछा मारल्यास नकारात्मक उर्जा होते दूर, हे सोपे उपाय अवश्य करा
वास्तूशास्त्राचे उपाय Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 21, 2023 | 8:04 AM
Share

मुंबई : प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात मीठ अवश्य असते. आपण त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो. मीठाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सागरी मीठ आणि पर्वतीय मीठ यामध्ये प्रमुख आहेत. पर्वतीय मीठाला रॉक मीठ म्हणतात. उपवासाच्या वेळी याचा भरपूर वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की मिठाचे विशेष महत्व ज्योतिषशास्त्रात (Salt Importance in Astrology) आणि वास्तूशास्त्रात देखील सांगण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रात मीठाचा संबंध शुक्र आणि चंद्राशी आहे. मिठाचे अनेक चमत्कारिक उपयोग ज्योतिष शास्त्रात आणि वास्तूशास्त्रात सांगितले आहेत. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया या उपायांबद्दल.

ज्योतिषशास्त्रात मिठाचा वापर

ज्योतिषांच्या मते जर पत्रिकेत चंद्र कमजोर असेल तर समुद्री मीठाचा वापर करू नये. अशा स्थितीत खडे मीठ फायदेशीर ठरते. त्याचबरोबर जर मंगळ कमजोर असेल तर समुद्री मीठाचा वापर फायदेशीर ठरतो. घरात मीठाच्या डब्यात लवंग ठेवणे देखील शुभ मानले जाते. यामुळे सुख-समृद्धी टिकून राहते. मिठाच्या पाण्याने घर पुसणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि संपत्ती वाढते.

मिठाचे 5 चमत्कारिक उपयोग

ज्योतिषी सांगतात की मन अस्वस्थ असेल तर मिठाच्या पाण्याने स्नान करावे. खोलीच्या कोपऱ्यात मिठाचा तुकडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वाईट दृष्टीचा त्रास होत असल्यास डोक्यावर मीठ शिंपडून ते वाहत्या पाण्यात टाकावे. जर तुम्ही दीर्घकाळ आजारी असाल तर तुमच्या पलंगाच्या शेजारी काचेच्या डब्यात मीठ ठेवल्यास फायदा होतो. हे एका आठवड्यात बदलले पाहिजे. जर शुक्र समस्या देत असेल तर मीठ दान करणे खूप फायदेशीर आहे.

मीठ वापरताना ही खबरदारी घ्या

मीठ नेहमी काचेच्या डब्यात ठेवावे. मीठ अजिबात वाया घालवू नका. जमिनीवर टाकू नका. मीठ थेट कोणत्याही व्यक्तीच्या हातात देऊ नका, अन्यथा नातेसंबंधात कडवटपणा निर्माण होऊ शकतो.मीठ कोणालाही उसणे मागू नये. सक्तीने किंवा दबावाखाली कोणाकडूनच मीठ स्वीकारू नये. घरात मीठाचा अतिरिक्त साठा ठेवावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.