Shukra Gochar 2025 : 2 दिवसांनी शुक्राची चाल बदलणार, या राशींना होणार सर्वाधिक फायदा! जोडीदारासोबतचे भांडण मिटणार

दोन दिवसांनंतर शुक्राची चाल बदलणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे.

Shukra Gochar 2025 : 2 दिवसांनी शुक्राची चाल बदलणार, या राशींना होणार सर्वाधिक फायदा! जोडीदारासोबतचे भांडण मिटणार
Shukra Gochar 2025
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 29, 2025 | 1:25 PM

ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला खूप महत्त्व आहे. कारण हा ग्रह धन, ऐश्वर्य, वैवाहिक सुख, भोग-विलास आणि वैभवाचा दाता मानला जातो. असे म्हणतात की ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो, तो व्यक्ती नेहमीच ऐषआरामी जीवन जगतो. अनेकदा शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींना मोठा फायदा होतो. यावेळी शुक्र ग्रह लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे काही राशींना खूप फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना कामात यश मिळण्यासोबतच प्रचंड धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक आणि प्रेम जीवनात आनंद वाढू शकतो.

शुक्र गोचर कधी होणार?

ज्योतिष गणनेनुसार, शुक्र ग्रह 28 जानेवारी 2025 पासून मीन राशीत संचार करत आहे. 31 मे 2025 रोजी शुक्र मीन राशीतील आपला प्रवास संपवून मंगळाच्या मेष राशीत गोचर करणार आहे. हे गोचर 31 मे रोजी सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी होईल.

Video: कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत नको ते करत होती… पती आला, सिंदूर पुसलं आणि नंतर…

या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील

शुक्राच्या गोचरामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र हा दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. त्यामुळे शुक्राचे मेष राशीत गोचर झाल्याने त्यांचे उत्पन्न आणि धनलाभाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

कर्क राशी

शुक्राच्या मेष राशीत गोचरामुळे कर्क राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात मोठे सकारात्मक बदल दिसतील. या काळात कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. धनलाभाचे नवे अवसर मिळतील. काही खर्च वाढण्याचे संकेत आहेत, त्यामुळे धनसंचयाकडे लक्ष द्या.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर आनंदाची पर्वणी घेऊन येत आहे. शुक्र ग्रह धनु राशीच्या पंचम भावात गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. मनाजोग्या कामात लाभ होईल. नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि काही मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच जोडीदारासोबतचे वाद मिटतील.