Chanakya Niti | भाग्यवान असतात ते ज्यांच्याकडे या 5 गोष्टी असतात

| Updated on: Jul 17, 2021 | 7:37 AM

आचार्य चाणक्य हे पैशाला खूप महत्वाचे मानत असले तरी त्यांचा असा विश्वास होता की पैसा हा एकमेव असा मित्र आहे जो कठीण परिस्थितीतही माणसाला आधार देतो. पण आचार्य यांच्यामते पैशांव्यतिरिक्त अशा आणखी 4 गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यक्तीला मिळाल्या तर त्याने स्वत: ला भाग्यवान मानले पाहिजे

Chanakya Niti | भाग्यवान असतात ते ज्यांच्याकडे या 5 गोष्टी असतात
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आजच्या काळात एखादी व्यक्ती केवळ पैशाला सुख मानते. आचार्य चाणक्य हे पैशाला खूप महत्वाचे मानत असले तरी त्यांचा असा विश्वास होता की पैसा हा एकमेव असा मित्र आहे जो कठीण परिस्थितीतही माणसाला आधार देतो. पण आचार्य यांच्यामते पैशांव्यतिरिक्त अशा आणखी 4 गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यक्तीला मिळाल्या तर त्याने स्वत: ला भाग्यवान मानले पाहिजे (Acharya Chanakya Said Those People Are Very LUcky Who Have These 5 Things In Life In Chanakya Niti).

1. आचार्य यांच्यामते, जर तुम्हाला दोन्ही वेळेचे अन्न मिळत असेल तर तुम्ही स्वत:ला भाग्यवान मानले पाहिजे. आपण सभोवताल पाहिलं तर आपल्याला कळेल की जगात अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांना अनेकदा जेवण मिळत नाही आणि ते उपाशी झोपून आपले जीवन व्यतीत करतात.

2. जर तुमची पाचक प्रणाली चांगली असेल तर स्वत:ला खूप भाग्यवान समजा. कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना अन्नाची कमतरता नाही परंतु ते काही कारणास्तव ते खाऊ शकत नाहीत. जर ते खाल्ले तर ते पचवू शकत नाहीत.

3. आपल्याकडे सुशील आणि प्रेमळ पत्नी असेल तर आपण जगातील एक भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहात. अशी स्त्री संपूर्ण कुळ सांभाळते. दुसरीकडे जु पत्नी वाद घालणारी असेल तर दिवस-रात्र घरात भांडणं होत राहतात. अशा कुळाचा विनाश होतो.

4. आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यास आपण भौतिक सुखांचा आनंद घेऊ शकत नाही, म्हणून एखाद्या व्यक्तीकडे पैसे असणे फार महत्वाचे आहे. गरीबी शापाप्रमाणे असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पैशांनी श्रीमंत असाल तर तुम्हाला आयुष्यात खूप आनंद मिळू शकेल. अशा लोकांनी स्वत: ला श्रीमंत मानले पाहिजे.

5. दान देण्याचा उत्साह प्रत्येकात नसतो. जर तुमच्यात हा उत्साह असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. दार करणारा दुसर्‍यांचे आयुष्य चांगलं बनवण्यात मदत करतो. त्याशिवाय पुण्य कमवून आपले कुटुंब आणि जीवन समृद्ध करतो. म्हणूनच धर्मग्रंथात दानचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे.

Acharya Chanakya Said Those People Are Very LUcky Who Have These 5 Things In Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर आयुष्यात कुठलीही समस्या नको असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 10 सल्ले लक्षात ठेवा

Chanakya Niti | ही तीन कामं करताना कधीही लाजू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकते