AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायात काळा धागा बांधल्याने काय होते? अन् बांधण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

भारतीय संस्कृतीत काळा धागा बांधण्याची श्रद्धा खूप जुनी आहे. त्यामागे अनेक कारणे सांगितली गेली आहेत. तसेच काळा धागा बांधण्याचे अनेक फायदेही सांगितले जातात. तर जाणून घेऊयात काळा धागा बांधल्याने होणारे बदल काय असतात आणि तो बांधण्यापूर्वी काय काळजी घ्यायची असते ते. 

पायात काळा धागा बांधल्याने काय होते? अन् बांधण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Black Thread on Ankle, Benefits, Rituals & PrecautionsImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 20, 2025 | 12:36 PM
Share

भारतीय संस्कृतीत काळा धागा बांधण्याची श्रद्धा खूप जुनी आहे. वाईट नजर आणि वाईट शक्तींपासून बचाव करण्यासाठी लोक तो बांधतात. विशेषतः महिला अनेकदा पायात बांधतात. त्याच वेळी, ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग शनि आणि राहू ग्रहांशी संबंधित मानला जातो. हा रंग एखाद्या व्यक्तीला त्यांच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी आणि नकारात्मक प्रभावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का पायात काळा धागा घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात.

काळा धागा कसा बांधायचा?

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार, मंगळवार किंवा अमावस्या हे दिवस धागा बांधण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानले जातात. तो बांधण्यापूर्वी प्रथम स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. नंतर गंगाजल किंवा पवित्र पाण्याने काळा धागा शुद्ध करा. त्यानंतर ‘ओम नम: शिवाय’ किंवा ‘ओम शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान 21 वेळा जप करा. नंतर उजव्या पायाच्या घोट्यावर सात गाठी करून तो धागा बांधा. धागा बांधण्यापूर्वी तुम्ही एखाद्या पात्र पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता. लक्षात ठेवा की जर धागा घाणेरडा किंवा जीर्ण झाला तर तो बदला आणि पुन्हा नवीन धागा बांधा.

काळा धागा कोणत्या पायावर बांधावा?

महिलांनी डाव्या हातात काळा धागा बांधावा आणि पुरुषांनी उजव्या हातात काळा धागा बांधावा. तसेच पुरुषांनी उजव्या पायावर आणि महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधावा. असे मानले जाते की काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत शनि ग्रह कमकुवत आहे, त्यांनी कमरेभोवती काळा धागा बांधणे शुभ मानले जाते

इतर कोणताही धागा घालू नका.

जर तुम्ही काळा धागा घातला असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या हातावर किंवा पायावर एकाच वेळी इतर कोणत्याही रंगाचा धागा बांधू नये. असे मानले जाते की काळ्या धाग्यासह दुसऱ्या रंगाचा धागा घातल्याने त्याचे शुभ परिणाम कमी होतात आणि जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

काळा धागा बांधल्याने फायदे

काळा धागा बांधल्याने शनि आणि राहू-केतूच्या वाईट प्रभावापासून मुक्तता मिळते असे मानले जाते. तर, लहान मुलांना जर काळा धागा बांधला तर त्यांचे वाईट नजरेपासून रक्षण होते . काळा धागा बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते असे मानले जाते. काळा धागा बांधल्याने आरोग्यही चांगले राहते, असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, काळा धागा बांधल्याने आर्थिक समस्या दूर होतात

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड