Chanakya Niti : तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असू द्या; त्याचा पराभव होणारच, चाणक्यांनी सांगितल्या पाच नीती

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसाने आपल्या शत्रूचा पराभव कसा करावा? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असू द्या; त्याचा पराभव होणारच, चाणक्यांनी सांगितल्या पाच नीती
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 8:20 PM

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपल्या शत्रूला कसं पराभूत करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचा राजा धनानंद याने अपमान केला होता, या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य यांनी बलाढ्य अशा धनानंदचा पराभाव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. आपल्या आयुष्यात चाणक्य यांना जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. चाणक्य म्हणतात मानसाचे दोन प्रकारचे शत्रू असतात, एक बाहेरचे व्यक्ती या शत्रूचा पराभव करणं हे खूप सोपं काम असतं, कारण या शत्रूला आपण ओळखत असतो, त्यामुळे आपण अशा व्यक्तीपासून कायम सावध असतो. मात्र दुसरा शत्रू हा सर्वात धोकादायक असतो, दुसरा शत्रू हा आपल्या घरातीलच व्यक्ती असतो. घरातील व्यक्तींवर आपला विश्वास असल्यामुळे आपण कायम बेसावध असतो. त्यामुळे समजा जर घरातील एखादा व्यक्तीच आपला शत्रू असेल तर त्यामुळे आपला मोठा घात होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य यांनी शत्रूंचा पराभव कसा करायचा? आपला मित्र कोण आणी शत्रू कोणं? हे कसं ओळखायचं याबद्दल आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये काही नीती सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात शत्रू कितीही बलाढ्य असू द्या, परंतु तुम्ही जर या मार्गाचा अवलंब केलं तर तुम्ही त्याचा नक्कीच पराभव करू शकता, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

साम, दाम दंड भेद – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला तुमच्या शत्रूचा पराभव करायचा असतो, तेव्हा तुम्ही साम, दाम, दंड भेद यापैकी एक कोणतीही नीती वापरू शकता.

कायम सावध रहा – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमचा शत्रू माहीत असेल तर त्याच्यापासून कायम सावध राहा, सतर्क राहा

शत्रूवर लक्ष ठेवा – चाणक्य म्हणतात तुमचा शत्रू काय करतो, त्याची पुढची चाल काय असू शकते, त्यावर कायम लक्ष ठेवा, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या योजनेची आखणी करा

योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुमचा शत्रू कोणीही असू शकतं, एखाद्यावेळी तुमच्या घरातील व्यक्ती देखील तुमचा शत्रू असू शकते, त्यामुळे तुमच्या योजना या नेहमी गुप्त ठेवाव्यात.

शत्रूच्या ताकदीचा अंदाज घ्या – चाणक्य म्हणतात तुमचा शत्रू किती ताकदवान आहे, त्याचा आधी व्यवस्थित अंदाज घ्या, आणि मगच त्यानुसार तुमचं नियोजन ठरवा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us