Chanakya Niti : असे लोकं जगावर राज्य करतात, चाणक्य यांनी सांगितली विजेत्याची लक्षणं

चाणक्य म्हणतात या जगात अशी काही लोक असतात, जे फक्त जिंकण्यासाठीच या जगात जन्माला आलेली असतात. त्यांचे शत्रू अशा लोकांचा कधीही पारभाव करू शकत नाहीत. या लोकांमध्ये असे काही गुण असतात, जे गुण त्यांना इतर लोकांपासून वेगळं बनवतात.

Chanakya Niti : असे लोकं जगावर राज्य करतात, चाणक्य यांनी सांगितली विजेत्याची लक्षणं
चाणक्य निती
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 11:29 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांचा राजा धनानंदाच्या दरबारामध्ये अपमान झाला होता. त्यानंतर त्यांनी या अपमानाचा असा बदला घेतला की राजा धनानंद याला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. चाणक्य यांनी आपली बुद्धी आणि कुट नीतीच्या जोरावर राजा धनानंद याची सत्ता उलथवून चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये विजेत्यांची काही लक्षणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात या जगात अशी काही लोक असतात, जे फक्त जिंकण्यासाठीच या जगात जन्माला आलेली असतात. त्यांचे शत्रू अशा लोकांचा कधीही पारभाव करू शकत नाहीत. या लोकांमध्ये असे काही गुण असतात, जे गुण त्यांना इतर लोकांपासून वेगळं बनवतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

कमी बोला – चाणक्य म्हणता जे लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात अशी लोक या जगावर राज्य करतात. तुम्ही जेव्हा कमी बोलतात आणि जास्त ऐकतात तेव्हा तुम्हाला त्याचा दुहेरी फायदा असतो. एक म्हणजे तुम्हाला जास्त ऐकण्याची सवय असेल तर तुम्हाला जगात काय चाललं आहे? लोकांची तुमच्याबद्दल काय मतं आहेत? याचा अंदाज येऊ शकतो, त्यापद्धतीने तुम्ही तुमच्या भविष्याकालीन योजना आखू शकतात. कमी बोलण्याचे देखील अनेक फायदे आहेत, चाणक्य म्हणतात ज्या लोकांना जास्त बोलण्याची सवय असते, असे लोक आपले भेद त्यांच्या नकळत शत्रूंना देखील सांगून मोकळे होतात, त्यामुळे अशा लोकांचा पराभव करणं किंवा त्यांच्याकडून एखादा भेद जाणून घेणं हे खूप सोपं काम असतं. त्यामुळे जास्त ऐकणं आणि कमी बोलणं हेच बुद्धिमान लोकाचं लक्षण आहे.

गर्व करू नका – चाणक्य म्हणतात तुम्ही जर तुमच्या आयुष्यात यशस्वी झालात तर कधीही गर्व करू नका, कारण ज्या व्यक्तीला गर्व होतो, तो व्यक्ती आंधळा होता, त्याला आजुबाजूच्या कोणत्याही गोष्टी नीट दिसत नाहीत, त्यामुळे अशा व्यक्तीचा पराभव करणं हे फार सोपं काम असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us