Shri Ramcharitmanas : श्री रामचरितमानसच्या या मंत्रांनी प्रत्येक समस्या होईल दूर, पूर्ण होतील सर्व मनोकामना

| Updated on: Sep 30, 2021 | 7:36 AM

सनातन परंपरेत भगवान श्री रामाची स्तुती करणाऱ्या श्री रामचरितमानसचे खूप महत्त्व आहे. हेच कारण आहे की प्रत्येक हिंदू कुटुंबात श्री रामचरित मानस आवश्यक आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी रचलेल्या या पवित्र ग्रंथात लिहिलेली प्रत्येक श्लोक एक दिव्य मंत्राप्रमाणे आहे. ज्याचे पठण केल्यावर, एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख, रोग, शोक लगेच दूर होतात आणि त्याला भगवान श्री रामाच्या कृपेने सर्व सुख मिळते.

Shri Ramcharitmanas : श्री रामचरितमानसच्या या मंत्रांनी प्रत्येक समस्या होईल दूर, पूर्ण होतील सर्व मनोकामना
Shree-ramcharitmanas
Follow us on

मुंबई : सनातन परंपरेत भगवान श्री रामाची स्तुती करणाऱ्या श्री रामचरितमानसचे खूप महत्त्व आहे. हेच कारण आहे की प्रत्येक हिंदू कुटुंबात श्री रामचरितमानस आवश्यक आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी रचलेल्या या पवित्र ग्रंथात लिहिलेली प्रत्येक श्लोक एक दिव्य मंत्राप्रमाणे आहे. ज्याचे पठण केल्यावर, एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख, रोग, शोक लगेच दूर होतात आणि त्याला भगवान श्री रामाच्या कृपेने सर्व सुख मिळते.

असे मानले जाते की ज्या घरात दररोज श्रद्धेने आणि विश्वासाने मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनावर आधारित  श्लोकांचे पठण केले जाते, त्या घरात राहणाऱ्या लोकांचे रक्षण करण्यासाठी हनुमान स्वत: हजर असतात आणि त्यांची सर्व कामे कुठल्याही अडथळ्यांविना पूर्ण होतात. मनोकामना पूर्ण करणाऱ्या अशाच काही श्लोकांबाबत जाणून घेऊ –

परीक्षेत यश मिळवण्यासाठी

जर कोणी परीक्षा-स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असेल आणि जर त्याला त्यात लवकरच यश मिळवायचे असेल तर त्याने श्री रामचरितमानसची हा श्लोक रोज पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने वाचावी-

‘जेहि पर कृपा करहिं जनुजानी।
कवि उर अजिर नचावहिं बानी।।
मोरि सुधारहिं सो सब भांती।
जासु कृपा नहिं कृपा अघाती।।’

आजारपणापासून मुक्त होण्यासाठी

जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा आजार सर्व उपचार करुनही बरा होत नसेल आणि तो नेहमी अडचणीत राहिला असेल, तर कोणत्याही मंगळवारपासून, तुम्ही दररोज खाली दिलेल्या श्री रामचरितमानसच्या या श्लोकाचे पठण करावे. हा उपाय केल्याने लवकरच रुग्णाला भगवान रामाच्या कृपेने औषधांचा लाभ मिळेल आणि त्याचे सर्व त्रास दूर होतील.

‘दैहिक दैविक भौतिक तापा।
राम काज नहिं काहुहिं व्यापा।।’

खटला जिंकण्यासाठी

जर तुम्ही कोर्टात एखाद्या प्रकरणामुळे अडकले असाल आणि तुम्हाला आतापर्यंत त्यात विजय मिळवता आला नसेल, तर तुम्ही श्री रामचरितमानसच्या या श्लोकाचा उपाय अवश्य करा. दररोज या श्लोकाचे पठण केल्याने तुम्हाला लवकरच न्यायालयीन प्रकरणात विजय मिळेल.

‘पवन तनय बल पवन समाना।
जनकसुता रघुवीर विबाहु।।’

रोजगारासाठी

जर तुम्ही या कोरोना काळात तुमची उपजीविका मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असाल आणि त्यानंतरही तुम्हाला यश मिळत नसेल, तर भगवान रामाच्या कृपेने तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसाय उज्वल करण्यासाठी खाली दिलेल्या श्लोकाचे पठण करावे –

‘बिस्व भरन पोषन कर जोई।
ताकर नाम भरत अस होई।।’

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Moti Shankh Remedy | देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर मोती शंख घरात ठेवा, घर-व्यापारात आर्थिक वर्षाव होईल

Pitru Paksha 2021 : श्राद्धात ब्राह्मणांना जेवण देताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पूर्वज नाराज होऊ शकतात