AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठ महापर्व उद्या होणार पूर्ण

छठ महापर्वाची यंदा सुरुवात पाच नोव्हेंबरला स्नान करून झाली. तर सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल. त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन थेट महापर्व समाप्त होईल

उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठ महापर्व उद्या होणार पूर्ण
| Edited By: | Updated on: Nov 07, 2024 | 6:34 PM
Share

हिंदू धर्मात छठ महापर्वाला खूप महत्त्व आहे. छठ महापर्वाची यंदा सुरुवात पाच नोव्हेंबरला स्नान करून झालीये. तर सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल. त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन थेट महापर्व समाप्त होईल आणि त्यानंतर महिला उपवास पूर्ण करतील. छटपूजेच्या चौथ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते आणि त्यासोबतच छठ उत्सवाची समाप्ती होते.

छटपूजा मुख्यतः सूर्य देव आणि छठ मैया यांच्या उपासनेचा सण आहे. या काळात 36 तासांचा निर्जली उपास केला जातो. ज्या दरम्यान फक्त मावळत्या आणि उगवत्या सूर्याची पूजा करतात. अशी मान्यता आहे की सूर्य देवाच्या आशीर्वादाने माणसाला निरोगी आयुष्य प्राप्त होते. आणि छठी मैयाच्या आशीर्वादाने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्त होते. मुलांच्या सुखी आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने अनेक इच्छित मनोकामना पूर्ण होतात.

उपवास सोडण्याची योग्य वेळ

तिथीनुसार गुरुवार सात नोव्हेंबर रोजी छटपूजेचा सण साजरा केला जाणार आहे. छटपूजा पूर्ण करण्यासाठी सात नोव्हेंबरला सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल आणि आठ नोव्हेंबरला सकाळी अर्घ्य दिले जाईल. आठ नोव्हेंबरला सूर्योदय सकाळी सहा वाजून 38 मिनिटांनी होईल. सूर्योदय झाल्यानंतर उपवास सोडता येईल.

उपास सोडण्याचे योग्य नियम

  • उपवास सोडण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्योदयाची वेळ. उपवास सोडण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले जातात.
  • पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करून तिथे दिवा लावावा. त्यानंतर प्रसाद तयार केला जातो.
  • प्रसादामध्ये साधारणपणे फळ, दूध, दही, थेकुवा या गोष्टींचा समावेश असतो.
  • सूर्यदेव आणि छठी मैयाची पूजा करून उगवत्या सूर्याला अर्घ्य दिला जातो. नंतर प्रसाद सगळ्यांना वाटून मग स्वतः घ्यायचा असतो.
  • पूजेनंतर गरिबांना दान करा.
  • उपवास सोडताना सात्विक जेवणच घ्यावे.

Follow Us
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.