AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: यंदा दोन दिवस धनत्रयोदशी? अनेकांच्या मनात आहे संभ्रम, जाणून घ्या नेमकी तारीख

धनत्रयोदशीच्या तारखेसंबंधित अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे हा सण नेमका कोणत्या तारखेला साजरा करायचा हे जाणून घेऊया

Diwali 2022: यंदा दोन दिवस धनत्रयोदशी? अनेकांच्या मनात आहे संभ्रम, जाणून घ्या नेमकी तारीख
धानोत्रयदशी Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 19, 2022 | 1:46 PM
Share

मुंबई, यावेळी धनत्रयोदशी (Dhanteras 2022) तिथी दोन दिवसांची असल्याने धनत्रयोदशी साजरी करण्याबाबत अनेकांना संभ्रम निर्माण झाला  आहे. या संदर्भात ज्योतिषी मानतात की त्रयोदशी तिथी प्रदोष काळात 22 आणि 23 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी येते, परंतु सूर्योदयाच्या दिवशी (Diwali 2022) येणारी तिथी आपण मनात असल्याने धनत्रयोदशीची पूजा 23 ऑक्टोबरला करणे उत्तम राहील. व्यापारी 22 ऑक्‍टोबरला हिशेब पुस्‍तकाची पूजा करू शकतात, परंतु भगवान धन्वंतरीची पूजा 23 तारखेलाच करणे योग्य ठरेल.

जोतिषशास्त्राच्या मते जी तिथी सूर्योदयाच्या वेळी येते, त्याच दिवशी तिथी साजरी करावी, अशी शास्त्रीय मान्यता आहे. त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.02 वाजता प्रदोष काळापासून सुरू होत आहे, ती 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.03 पर्यंत राहील. उदयतिथीचे महत्त्व असल्याने या दिवशी धनत्रयोदशी साजरी करा. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी व  हनुमानजींची पूजा करावी.

 दीपावलीची पूजा रात्री

24 ऑक्टोबरला चतुर्दशी तिथी येत आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करणे उत्तम मानले जाते. या दिवशी सकाळी 6.07 वाजता होणार आहे. या दिवशी उटणे लावून आंघोळ केल्याने रूप निखरते. या दिवशी तिळाचे उटणे लावण्याला विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.27 पासून सुरू होत आहे, जी 25 ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत राहील. 25 तारखेला सूर्यग्रहण असल्याने आणि पर्व काळ  पहाटे 4.51 पासून सुरू होणार असल्याने महालक्ष्मी पूजन, कुबेर पूजन 24 तारखेलाच करणे उचित आहे.

सूर्यग्रहणामुळे दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा

दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते, मात्र सकाळी सूर्यग्रहण असल्याने पूजा होणार नाही. दुसऱ्या दिवशी 26 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा होणार आहे. या दिवशी गाईची पूजा केली जाते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.