AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guruwar Upay : गुरूवारच्या दिवशी अवश्य करा हे पाच प्रभावी उपाय, कायम पाठीशी राहिल भगवान विष्णूंचा आशिर्वाद 

हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण किंवा श्रावणी पौर्णिमा म्हणतात. त्यामुळे 31 ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा आहे. या दिवशी विविध तीर्थक्षेत्रांवर स्नान व दान करण्यात येणार आहे.

Guruwar Upay : गुरूवारच्या दिवशी अवश्य करा हे पाच प्रभावी उपाय, कायम पाठीशी राहिल भगवान विष्णूंचा आशिर्वाद 
भगवान विष्णूImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 31, 2023 | 12:54 PM
Share

मुंबई : 31 ऑगस्ट रोजी श्रावण शुक्ल पक्षातील उदय तिथी पौर्णिमा आणि गुरुवार (Guruwar Upay) आहे. पौर्णिमा 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.06 वाजता संपली आहे, सध्या श्रावण कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू आहे. 31 ऑगस्ट हा स्नान-दानाचा पौर्णिमा दिवस आहे. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण किंवा श्रावणी पौर्णिमा म्हणतात. त्यामुळे 31 ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा आहे. या दिवशी विविध तीर्थक्षेत्रांवर स्नान व दान करण्यात येणार आहे. कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवन आनंदी होते, पण आज जर तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्री जाता येत नसेल तर या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाकून घरी स्नान करू शकता आणि गरजूंना काहीतरी दान करू शकता.

तसेच सुकर्म योग 31 ऑगस्टला संध्याकाळी 5:15 पर्यंत राहील. सुकर्म योगात केलेल्या कामांमध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत, परंतु कामे शुभ असतात. याशिवाय शतभिषा नक्षत्र 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.47 वाजता राहील. आणि आज गुरुवारही आहे. अशा स्थितीत जाणून घ्या, विविध शुभ परिणाम मिळण्यासाठी, कुटुंबात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी, जीवनात यश मिळवण्यासाठी गुरुवारी कोणते उपाय करावेत.

गुरूवारचे हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी

जर तुम्हाला तुमच्या वागण्याने इतरांना प्रभावित करायचे असेल तर या दिवशी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा. यासोबतच देवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा.  त्या लाडवाचा प्रसाद घरातील सर्व सदस्यांना आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये वाटावा. या उपायाने, तुम्ही तुमच्या वर्तनाने इतर लोकांवर प्रभाव टाकण्यास सक्षम असाल.

जर तुम्ही काही व्यावसायिक कारणासाठी प्रवास करणार असाल आणि तुमच्या प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करा आणि स्नान केल्यानंतर देवासमोर हात जोडून केळी अर्पण करा. कोणतेही छोटे पिवळ्या रंगाचे कापड घ्या आणि ते गुरुवारच्या संपूर्ण दिवसासाठी आपल्याजवळ ठेवा. असे केल्याने तुम्हाला कोणत्याही व्यावसायिक कामासाठी केलेल्या प्रवासाचा नक्कीच फायदा होईल.

जर तुमच्या वैवाहिक जीवनात कटूता आली असेल, तर या दिवशी तुम्ही मंदिरात केळी आणि पिवळे वस्त्र दान करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील.

जर तुमचा जोडीदाराचे आणि तुमच्या आई अजिबात पटत नसेल, तर त्यांच्यातील संबंध चांगले राहण्यासाठी दोघांच्या कपड्यांमधून प्रत्येकी एक धागा काढून ते धागे एकत्र बांधा आणि मंदिरात अर्पण करा. यासोबतच मंदिरात कापूर दिवा लावा आणि दोघांमध्ये चांगले नाते निर्माण होण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा. असे केल्याने तुमचा जोडीदार आणि आई यांच्यातील नाते लवकरच सुधारेल.

कोणत्याही प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी मंदिरात पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करावे आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने तुमची भीती दूर होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us