AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीच्या दिवशी या गोष्टी घडल्या तर समजून जा, लवकरच तुमचं भाग्य चमकणार, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासोबत दिवाळीच्या दिवशी घडल्या तर लवकरच तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

दिवाळीच्या दिवशी या गोष्टी घडल्या तर समजून जा, लवकरच तुमचं भाग्य चमकणार, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2025 | 9:37 PM
Share

हिंदू पंचागानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो, दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला दीपोत्सव असं देखील म्हटलं जातं. दिवाळीमध्ये प्रकाशाला खूप महत्त्व असून, या काळात दिव्यांनी संपूर्ण घर उजळून निघतं, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यास आपल्या भक्तांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो, घरावर कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट येत नाही. जे घर स्वच्छ असतं, जिथे नकारात्मक शक्तींचा प्रवेश नसतो, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो असं मानलं जातं, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं असं मानलं जातं, त्यामुळे या काळात घरामध्ये दिवे लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासोबत दिवाळीच्या दिवशी घडल्या तर लवकरच तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

घुबडाचं दर्शन – वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या एक रात्र आधी जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास घुबडाचं दर्शन झालं, घुबड दिसलं तर हे खूपच शुभ संकेत असतात. याचाच अर्थ लवकरच तुमची आर्थिक परिस्थिती बदलणार आहे, तुमच्यावरील सर्व प्रकारचे आर्थिक संकट दूर होणार आहेत, याचे हे संकेत असतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

धनामध्ये वृद्धी किंवा नोकरीत प्रमोशन – जर दिवाळीच्या दिवशी किंवा एक- ते दोन दिवस आधी जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं किंवा तुमच्याकडे अचानक कोणत्याही मार्गाने पैसे आले तर तो एक शुभ संकेत असतो, याचाच अर्थ लवकरच तुम्हाला आता सुखाचे दिवस येणार आहेत, असा होतो.

कर्जातून मुक्त होणं किंवा खर्च अचानक कमी होणं – हा देखील एक शुभ संकेत आहे, जर या काळात तुमच्यावर असलेले कर्ज फिटलं तर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरासमोर गायीचं आगमन – हा देखील एक शुभ संकेत असतो, जर दिवाळीच्या दिवशी गाय तुमच्या दारात आली तर तिची पूजा करा, कारण याचा अर्थ तुमच्यावर देवी, देवता प्रसन्न आहेत, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.