तुम्हालाही ‘हे’ 5 शुभ संकेत मिळत असतील तर समजून घ्या तुमचे चांगले दिवस होणार सुरू

सनातन धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, काही शुभ संकेत दिसायला लागले की एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होऊन आनंदाचे सुखाचे दिवस सुरू होतात. तर आजच्या लेखात आपण या संकेतांबद्दल जाणून घेऊयात...

तुम्हालाही हे 5 शुभ संकेत मिळत असतील तर समजून घ्या तुमचे चांगले दिवस होणार सुरू
Lakshmi mata
| Edited By: | Updated on: Nov 08, 2025 | 4:41 PM

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला आणि वाईट अशा दोन्ही वेळा येत असतात. वाईट वेळ येण्यापूर्वी आपल्या कामांमध्ये अनेक अडचणी, दु:ख, आजारापण येत असतात. तर चांगली वेळ येताना काही शुभवार्ता आपल्या सोबत घडत असतात. तर असे काही संकेत आपल्याला मिळत असतात. तर या शुभसंकेताना काहीजण समजून घेतात तर काही लोकंही याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आजच्या या लेखात आपण अशा संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे पाहिल्यावर जीवनात काहीतरी चांगले घडणार असल्याचे सूचित करतात.

स्वप्नात लक्ष्मी मातेला पाहणे

तुम्हाला जर स्वप्नात धनाची देवी लक्ष्मी माता दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात लक्ष्मी देवीचे दर्शन होत असेल तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते.

ब्रह्म मुहूर्तावर जाग येणे

तुम्ही जर ब्रह्म मुहूर्तावर जागे झालात तर ते सकारात्मक बदलांचे संकेत तुम्हाला देत असते. असे मानले जाते की हे चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते.

वाटेत एका पुजाऱ्याचे दर्शन होणे

रस्त्यावर चालताना एखादा पुजारी दिसणे हे शुभ मानले जाते. रस्त्यावर पुजारी दिसणे हे सकारात्मक संकेत आणते आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करण्याचे संकेत दर्शवते. असे मानले जाते की हे संकेत बहुतेकदा धार्मिक श्रद्धेशी संबंधित असते.

घरात पक्ष्याने घरटे बांधणे

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात पक्ष्याचे घरटे असल्याने आनंद मिळतो. .तुमच्या घरात जर पक्ष्याने घरटे बांधले असेल तर ते एक शुभ संकेत तुमच्या आयुष्यात येणार असल्याचे मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना सर्व समस्यांवर मात करता येते.

तुळस हिरवीगार बहरणे

धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीच्या रोपात लक्ष्मी देवीचा वास असतो . तुळशीची पूजा केल्याने घरात देवीचा वास सदैव राहतो. तुळशीचे रोप हिरवेगार ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. हिरवीगार तुळशीची रोपे सुख, शांती आणि संपत्ती वाढवतात असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. या दिशेला तुळशी लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)