AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे? मग चाणक्य यांच्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील तेवढ्याच उपयोगी ठरतात. आयुष्य जगत असताना अनेकांना चाणक्य यांचे विचार प्रेरण देतात, त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करतात.

Chanakya Neeti : कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे? मग चाणक्य यांच्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा
चाणक्य नीती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2025 | 7:34 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. ते अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात काही लोक हे आयुष्यभर खूप कष्ट करतात, मात्र त्यांना लवकर यश मिळत नाही, त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं, त्या ठिकाणी ते कधीच पोहोचू शकत नाहीत, मात्र या उलट काही लोक असे असतात की जे कमी कष्टामध्ये आणि कमी वयातच प्रचंड यश मिळवतात. त्यांना जिथे जायचं असतं, जे मिळवायचं असतं त्या गोष्टी हे लोक सहज मिळवतात. असं का होतं? तर या गोष्टी फक्त चुकीच्या प्रयत्नांमुळे आणि दिशा निश्चित नसल्यामुळे घडतात, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टींचं पालन केल्यास तुम्हाला यश सहज मिळू शकेल, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मनावर नियंत्रण – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला यश मिळवायचं असतं, दूरवरचा पल्ला गाठायचा असतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, जगात असे काही लोक असतात, जे थोड्याशा यशानं देखील हुरळून जातात. सारासार विचार कण्याची क्षमता गमावून बसतात, अशा लोकांचं त्यांच्या मनावर नियंत्रण राहात नाही, परिणामी त्यांचं लक्ष त्यांच्या ध्येयापासून विचलित होते. जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयापासून विचलित होतं, तेव्हा तुम्हाला अपयश येतं. मात्र असे देखील काही लोक असतात, जेव्हा त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळतं, तेव्हा ते शांत असतात, असे लोक आता आपल्याला पुढचं यश कसं मिळावायचं आहे? याचा विचार करतात, आणि यातूनच त्यांना यशाचा मार्ग सापडतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशासाठी तुमचं तुमच्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं आहे, असं चाणक्य म्हणतात.

प्रयत्नांची दिशा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही ठरवता की मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे, तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय कोणता, प्रयत्नाची दिशा काय ठेवायची याचा विचार करा, अनेकदा आपण ठरवतो, की मला या गावाला जायचं आहे, मात्र तुम्ही जर उलट्या दिशेनं चालत गेलात तर आयुष्यात कधीच तुम्ही तुमच्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, त्यामुळे प्रयत्नाची दिशा योग्य असली पाहिजे.

संयम – चाणक्य म्हणतात संयम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, अनेकजण पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं तर प्रयत्न करणं सोडून देतात, मात्र अपयश आल्यानंतर देखील जो वारंवार प्रयत्न करतो, तो यशस्वी होतोच.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?