
हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात भाविक उपवास करतात, व्रत करतात आणि भगवान शिवाची आराधन करतात.तसेच श्रावणात भगवान शिवाला वेगवेगळे भोग अर्पण करतात. श्रावण महिना हा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या पवित्र महिन्यात शिवभक्त पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने उपवास करतात आणि भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष पूजा करतात.
असे मानले जाते की या महिन्यात भगवान शिवाला काही विशेष भोग अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही शिवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सावन सोमवारी हे भोग त्यांना अवश्य अर्पण करा.
श्रावण महिन्यात भगवान शिवाला अर्पण करायचे हे 5 पदार्थ
पांढरी बर्फी
पांढरी बर्फी ही भगवान शिवाला सर्वात महत्वाचा नैवेद्य मानली जाते. ही बर्फी मावा, साखर आणि दूध मिसळून तयार केली जाते. असे मानले जाते की भगवान शिव यांना ही खूप आवडते आणि हा नैवेद्य अर्पण केल्याने नक्कीच त्यांचे आशीर्वाद मिळतात.
गूळ
गूळ हा भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. तो पवित्रता आणि उर्जेचे प्रतीक मानला जातो. तसेच असे मानले जाते की उपवासाच्या वेळी भगवान शिव यांना गूळ अर्पण केल्याने जीवनात गोडवा आणि सौभाग्य येते
सुका मेवा
बदाम, काजू, पिस्ता यांसारखे सुकामेवा देखील भगवान शिवाला अर्पण करणे शुभ मानले जाते. तुम्ही ते सुका मेवा मिठाईमध्ये मिसळून किंवा प्लेटमध्ये वेगळे सजवून भोलेनाथला अर्पण करू शकता. सुका मेवा समृद्धी आणि उर्जेचे प्रतीक मानले जातात.
केळी
केळी हे एक सात्विक आणि पौष्टिक फळ आहे. जे भगवान शिवासह सर्व देवी-देवतांना अर्पण करता येते. श्रावण सोमवारच्या उपवासात ते शिवलिंगावर अवश्य अर्पण करा. यामुळे भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात. असं म्हणतात.
भांग पेडा
भांग हा भगवान शिवांना खूप प्रिय मानला जातो. श्रावण आणि महाशिवरात्री महिन्यात याचा वापर विशेषतः केला जातो. जेव्हा ते माव्यामध्ये मिसळून पेढ्याच्या स्वरूपात तयार केले जाते. आणि ते प्रसाद स्वरुपात बनवून शीवाला अर्पण केला जातो. या सोमवारी उपवासादरम्यान तसेच भगवान शिवांना ते भोग म्हणून अर्पण केला जातो.