रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वर्धा जिल्ह्यात तुरीच्या पिकाला रानडुकरांमुळे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या तुरीची झाडे रानडुकरांनी जमीनदोस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली आहे. काही शेतकरी सलग तुरीचे पीक घेत आहेत, तर काही जणांनी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली आहे. सध्या तुरीचे पीक बहरलेले असून त्याला शेंगा लागल्या आहेत आणि फुले देखील मोठ्या प्रमाणात आहेत. येत्या काही दिवसांत हे पीक काढणीला येणार आहे.
मात्र, याच वेळी शेतशिवारात वन्यप्राण्यांचा, विशेषतः रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रानडुकरांच्या धुमाकुळामुळे तुरीचे पीक अक्षरशः जमीनदोस्त होत आहे. तुरीची झाडे तुटून पडत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यापूर्वीच खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आता रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांमुळे तुरीच्या पिकाचेही नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

