AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही रात्री झोपताना दाराकडे पाय करून झोपता का? मग हे वाचाच

प्रत्येकाच्या झोपण्याच्या पद्धती फार वेगवेगळ्या असतात. वास्तुशास्त्रानुसार, झोपण्याची दिशा आणि पद्धत आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडते असं म्हटलं जातं. त्यातीलच एक म्हणजे दाराकडे पाय करून झोपणे. अनेकजण दाराकडे पाय करून झोपतात. वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत योग्य आहे की नाही हे जाणून घेऊयात.

तुम्हीही रात्री झोपताना दाराकडे पाय करून झोपता का? मग हे वाचाच
Is it right or wrong to sleep with your feet towards the door according to Vastu ShastraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 12:46 PM
Share

वास्तुशास्त्रात जसे घराबाबत, किचनबाबत काही नियम सांगितलेले असतात त्याचप्रमाणे इतरही सवयींबाबत काही नियम सांगितलेले असतात ज्यामुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. त्यातीलच एक म्हणजे झोपण्याची सवय. प्रत्येकांच्या झोपण्याच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण वास्तूशास्त्रानुसार झोपण्याच्या पद्धतीचा देखील आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो.

योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने पाय ठेवून झोपल्याने अनेक फायदे होतात

वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने पाय ठेवून झोपल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. त्यामुळे जामून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना पाय दाराकडे करून झोपावं की नाही.

घरातील मुख्य दरवाजाची भूमिका

वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजा हा घरात उर्जेचा प्रवेश आणि निर्गमन बिंदू म्हणजे कोणतीही ऊर्जा जाण्याचा येण्याचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जर एखादी व्यक्ती दाराकडे पाय ठेवून झोपली तर असे मानले जाते की नकारात्मक ऊर्जा त्यांच्यावर थेट परिणाम करू शकते. म्हणून, हे अशुभ मानले जाते.

लक्ष्मी देवीचा अपमान

वास्तु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दरवाजा हा घराचे प्रवेशद्वार आहे आणि तिथे पाऊल ठेवणे हे घराच्या देवाचा किंवा देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते. म्हणूनच प्राचीन काळापासून हे निषिद्ध मानले जाते. ही केवळ एक परंपरा नाही तर एक प्रकारची धारणा देखील आहे.

झोपही बिघडते

शिवाय, दारातून येणारा वारा आणि हालचाल तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतात. कधीकधी, या दिशेला पाय ठेवून झोपल्याने पूर्ण मानसिक विश्रांती मिळते आणि झोप कमी लागते. म्हणूनच, झोपेत व्यत्यय येऊ नये आणि शरीर आणि मन दोन्हीही आरामशीर राहावे यासाठी वास्तुने हे लक्षात घेतले आहे.

उपाय

आता उपायाबद्दल बोलायचं झालं तर , जर तुमचे पाय दाराकडे असतील तर बेड आणि दाराच्या मध्ये पडदा किंवा पार्टीशन लावा. याव्यतिरिक्त,शक्य असल्यास झोपताना दार बंद ठेवा. योग्य ऊर्जा प्रवाह राखण्यासाठी खोलीत मंद प्रकाश आणि स्वच्छ जागा ठेवा.

झोपण्याची सर्वोत्तम दिशा

वास्तुशास्त्रात, उत्तर दिशा ही सकारात्मक दिशा मानली जाते. असे म्हटले जाते की उत्तरेकडे पाय ठेवून झोपल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ज्यामुळे ती झोपण्याची आदर्श दिशा बनते.

डोके आणि पायांची योग्य दिशा

वास्तुनुसार तुमचा पलंग असा ठेवा की तुमचे पाय उत्तरेकडे आणि तुमचे डोके दक्षिणेकडे असेल. यामुळे आनंदी जीवन सुनिश्चित होते आणि तुमच्या घरात समृद्धी येण्यास मदत होते.

चांगले मानसिक आरोग्य

असे मानले जाते की उत्तरेकडे पाय ठेवून झोपल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. ही दिशा मानसिक आरोग्यासाठी चांगली मानली जाते आणि या दिशेला पाय ठेवून झोपल्याने तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.