AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lagnagath: लग्नाच्या विधीत का बांधली जाते गाठ? अनेकांना नाही माहिती यामागचे कारण!

वराच्या खांद्यावर ठेवलेले उपवस्त्र वधूच्या उपवस्त्रासोबत एका गाठीने (Lagnagath) बांधले जाते. ही गाठ का बांधली जाते याचा कधी विचार केला आहे का?

Lagnagath: लग्नाच्या विधीत का बांधली जाते गाठ? अनेकांना नाही माहिती यामागचे कारण!
लग्नगाठImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 19, 2023 | 9:02 PM
Share

मुंबई, जगभरात अनेक धर्मांचे पालन करणारे लोक आहेत. प्रत्येक धर्माची स्वतःची परंपरा असते. वेगवेगळी संस्कृती अंगीकारल्यानंतरही प्रत्येक समाजात विवाह विशेष महत्व आहे. हिंदू धर्मातील विवाहांमध्ये अनेक विधी पाहायला मिळतात. तुम्ही पाहिलं असेल की लग्नादरम्यान वराला वधूसोबत एका गाठीने बांधले जाते. यामध्ये वराच्या खांद्यावर ठेवलेले उपवस्त्र वधूच्या उपवस्त्रासोबत एका गाठीने (Lagnagath) बांधले जाते. ही गाठ का बांधली जाते याचा कधी विचार केला आहे का? जाणून घेऊया या बद्दल काही रंजक माहिती.

यासाठी बांधली जाते गाठ

हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या विधींना विशेष महत्त्व आहे. शास्त्राचे जाणकार सांगतात की, लग्नाचे हे विधी योग्य पद्धतीने पार पाडले गेले नाहीत तर वधू-वरांच्या वैवाहीक जीवनात अनेक अडथळे येतात. वधू आणि वर यांच्यात बांधलेली गाठ एक पवित्र बंधन म्हणून पाहिली जाते. वराचे उपवस्त्र आणि वधूची चुनरी यांच्यामध्ये गाठ बांधली जाते.

या गाठीला वैवाहिक चिन्ह म्हणून पाहिले जाते. ही गाठ वधू-वरांच्या शरीर आणि मनाला बांधून ठेवण्याचे प्रतीक असते.  असे म्हणतात की ही गाठ जितकी मजबूत असेल तितके पती-पत्नीचे नाते अधिक मजबूत आणि प्रेमळ असते. ही गाठ बांधण्याचे काम वराची बहीण करते. ही गाठ केवळ वधू आणि वर यांच्यातील नातेच सांगते असे नाही तर ते दोन कुटुंबांना जोडण्याचेदेखील काम करते.

एक वचन आहे ही गाठ

ही गाठ म्हणजे देवासमोर दिलेले एक प्रकारचे वचन आहे की दोघेही एकमेकांशी एकनिष्ठ राहतील. ही गाठ त्यांच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक एकतेचे प्रतीक आहे. या गाठीमध्ये नाणे, तांदूळ, दुर्वा, फुले अशा वस्तू बांधल्या जातात. म्हणजे पती-पत्नीचा संपत्ती आणि धान्यावर समान हक्क असेल. दोघेही आपल्या आयुष्यातील आनंद एकत्र उपभोगतील असा यामागचा अर्थ आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.