AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कैंची धामहून परतताना या गोष्टी आणायला विसरू नका, बदलेल नशीब

नीम करोली बाबाचा आश्रम नैनितालच्या कैंची धाममध्ये आहे. भक्त नीम करोली बाबा यांना भगवान हनुमानाचा अवतार मानतात आणि त्यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो लोक कैंची धामला येतात. नीम करोली बाबांना कलियुगातील हनुमानजी म्हणतात. असे मानले जाते कैंची धाममधून परत येताना काही वस्तू तिथून नक्कीच आणाव्यात. त्यांच्या येण्यामुळे आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत मिळते. कोणत्या आहेत त्या वस्तू पाहुयात.

कैंची धामहून परतताना या गोष्टी आणायला विसरू नका, बदलेल नशीब
Kainchi DhamImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2025 | 11:31 AM
Share

नीम करोली बाबा हे भारतातील एक महान संत आणि आध्यात्मिक गुरू होते, ज्यांच्या शिकवणी अजूनही लाखो लोकांच्या जीवनाचे मार्गदर्शन करतात. नीम करोली बाबांचा प्रसिद्ध आश्रम ‘कैंची धाम’ उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये आहे, जो आज श्रद्धा आणि शांतीचे एक चांगले केंद्र बनले आहे. दरवर्षी लाखो भाविक कैंची धामला भेट देतात. पण जर तुम्ही कैंची धामला जात असाल तर कैंची धामहून परतताना काही वस्तू सोबत आणाव्यात असं म्हटलं जातं. कारण त्यामुळे नीम करोली बाबांचा आशीर्वाद तर लाभतोच पण सोबतच समस्या दूर होण्यास मदत होते. पाहुयात मग त्या वस्तू नमेक्या कोणत्या आहे त्या.

कैंची धाम येथील नीम करोली बाबांचा फोटो कैंची धाममधील नीम करोली बाबांचा फोटो आणल्याने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते. मान्यतेनुसार, जिथे जिथे नीम करोली बाबांचे चित्र असते तिथे नेहमीच आनंद, शांती असते आणि संपत्तीची कमतरता नसते.

नीम करोली बाबांना अर्पण केलेले ब्लँकेट जर तुम्ही कैंची धामला जात असाल तर तिथून नीम करोली बाबांना अर्पण केलेले ब्लँकेट नक्कीच आणा. हे ब्लँकेट खूप चमत्कारिक मानले जाते. त्या चादरीत बाबांचे आशीर्वाद असतात असे मानले जाते. जो भक्त ती चादर सोबत ठेवतो त्याला कधीही कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.

नीम करोली बाबाच्या आश्रमातील प्रसाद नीम करोली बाबांच्या आश्रमातील प्रसाद खूप पवित्र आहे. असे मानले जाते की त्यावर नीम करोली बाबांचा आशीर्वाद असतोच. कैंची धामहून प्रसाद आणल्याने तुमचा प्रवास पूर्ण होतोच, शिवाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि बदलही येतो.

कैंची धामची पवित्र माती कैंची धामची माती देखील चमत्कारिक मानली जाते. लोकांचा असा विश्वास आहे की येथे हनुमानजी राहतात. येथील मातीमध्ये चमत्कारिक शक्ती आहेत. म्हणूनच भक्त ते घरी घेऊन जातात. त्यांचा असा विश्वास आहे की ही माती घरात सुख, समृद्धी आणि शांती आणते. ती माती घरी आणल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील सुख-समृद्धी अनेक पटींनी वाढते.

तर तुम्हीही कधी कैंची धामला गेलात तर नक्कीच या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)