AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांचे गाव तरी कोणते? 40 वर्षांपासून नाही गेले घरी, वाट पाहतायेत गावकरी?

Premanand Maharaj Villagers : प्रेमानंद महाराज यांचे अनुयायी आणि सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. सर्वच धर्मातील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. त्यात अनेक सेलिब्रिटी आणि बड्या नेत्यांचा, साधु संताचा समावेश आहे. प्रेमानंद महाराज हे त्यांच्या गावी गेल्या 40 वर्षांपासून गेलेले नाहीत.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांचे गाव तरी कोणते? 40 वर्षांपासून नाही गेले घरी, वाट पाहतायेत गावकरी?
प्रेमानंद महाराज यांचे मूळ घरImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 28, 2025 | 4:47 PM
Share

प्रेमानंद महाराज आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. कोणतेही कर्मकांड नाही, केवळ नाम जप करा असा साधा सोपा उपाय ते सांगतात. अनेकांच्या जीवनातील समस्या, अडचणीवर ते मार्गदर्शन करतात. त्यात अवडंबर नसते. तर साधा उपाय असतो. प्रेमानंद महाराज यांना एका शारीरिक व्याधीने पछाडलेले असताना ही मनोबलाच्या साधनेवर त्यांची प्रसन्न मुद्रा अनेकांना बळ देते. पण महाराज गेल्या 40 वर्षांपासून त्यांच्या मूळ गावी गेलेले नाहीत.

कोणते आहे मूळ गाव?

उत्तर प्रदेशात त्यांचे मूळ गाव आहे. कानपूर जिल्ह्यातील अगदी टोकाचे नरवळ हे त्यांचे गाव आहे. सरसौल या भागात ते येते. येथील प्राथमिक शाळेपासून जाणाऱ्या एका गल्लीत त्यांचे घर आहे. हे घर दोन मजली आहे. या घराच्या बाहेर श्रीगोविंद शरणजी महाराज वृंदावन जन्मस्थळ अशा आशयाची एक पाटी सुद्धा आहे. वृदांवन येथील प्रेमानंद महाराज यांचे हे मूळ घर आहे. हे घर त्यांनी 40 वर्षांपूर्वी सोडले आणि संन्यास घेतला.

अवघ्या 13 व्या वर्षी घर सोडले

प्रेमानंद महाराज यांचे शिक्षण 8 वी पर्यंत झाले. इयत्ता 9 वी मध्ये त्यांचा प्रवेश झाला. चार महिने ते शाळेत गेले. महादेवाच्या पिंडीसाठी ओटा उभारणीचे काम त्यांनी सुरू केले. त्यावेळी कोणीतरी त्यांना विरोध केला. त्यांनी प्रयत्न केला. पण काम अर्धवट राहिले. यामुळे ते मनातून अत्यंत नाराज झाले. ही गोष्ट 1985 मधील आहे. त्यावेळी ते 13 वर्षांचे होते. एक दिवस सकाळी 3 वाजता ते घर सोडून निघून गेले. त्यांचा खूप शोध घेतल्यावर जवळीलच एका शिव मंदिरात ते आढळले. त्यांनी घरी येण्यास नकार दिला.

त्यांचे मोठे भाऊ गणेश दत्त पांडेय हे त्यांची लहानपणीची ही आठवण सांगताना भावुक झाले. पुढे सैमेंसी या गावातील शिव मंदिरात ते चार वर्षे पूजा अर्चना आणि ध्यान करत होते. पण एक दिवस त्यांनी हा परिसर सोडला आणि ते थेट वृंदावनात आले. पुढे त्यांचे उभे आयुष्य गंगा घाटावर साधनेत गेले. ते केवळ एकवेळेस जेवत. जर त्यांच्या निश्चित वेळेत जेवण मिळाले तरच ते ग्रहण करत नाही तर गंगेच्या पाणी पिऊन तो दिवस पुढे ढकलत.

आज त्यांचे मित्र, गावकरी त्यांची वाट पाहत आहेत. त्यांनी एकदा तरी गावी यावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या काळातील शाळा आता मोडकळीस आली आहे. पण तिच्या आठवणी त्यांच्या मित्रांच्या मनात रूंजी घालतात. ते लहानपणापासूनच धार्मिक कार्यात गुंतलेले असल्याचे मित्र सांगतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.