AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना करा या मंत्राचा उच्चार, लाभेल सुख-समृद्धी

यावेळी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच आज बुधादित्य, षष्ठ आणि वासरपती योग तयार होत आहेत. या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रात्री 9.2 नंतर आहे, भद्रा असल्याने त्यापूर्वी राखी बांधली जाणार नाही.

Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना करा या मंत्राचा उच्चार, लाभेल सुख-समृद्धी
रक्षाबंधनImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 30, 2023 | 2:02 PM
Share

मुंबई : देशभरात आज आणि उद्या रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023) सण साजरा केला जाणार आहे. बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची आणि प्रगतीची कामना करते. यावेळी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच आज बुधादित्य, षष्ठ आणि वासरपती योग तयार होत आहेत. या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रात्री 9.2 नंतर आहे, भद्रा असल्याने त्यापूर्वी राखी बांधली जाणार नाही. 31 ऑगस्टला राखी बांधण्याची वेळ फक्त सकाळी 7.05 पर्यंत आहे. यानंतर श्रावण पौर्णिमेची तिथी समाप्त होईल. भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त निवडण्यासोबतच शुभ मंत्राचे पठणही खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून भावा-बहिणीचे प्रेम सदैव टिकून राहते आणि भावाचे आयुष्यही वाढते.

राखी बांधताना या मंत्राचा करा उच्चार

तेन त्वाम् प्रतिबद्धनामि, रक्षे माचल माचल:।

या मंत्राचा अर्थ असा आहे की मी तुझ्या मनगटावर हा पवित्र धागा बांधत आहे जो राजा बळीच्या रक्षणासाठी बांधला होता. जे तुम्हाला सर्व संकटांपासून वाचवेल. भावानेही बहिणीला प्रत्येक संकटात साथ देण्याचे वचन दिले पाहिजे बहिणीने रक्षाबंधनाला बांधल्यानंतर भावानेही वचन द्यावे की मी बहिणीला तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात साथ देईन आणि बहिणीचे सदैव रक्षण करीन.

रक्षाबंधनाच्या दिवशी ही कामे करू नका

  •  जर तुम्ही 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करत असाल तर भद्राकाळात भावाला राखी बांधू नका. ते अशुभ मानले जाते. भाद्र काळात रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली आणि त्याच वर्षी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला अशी धार्मिक मान्यता आहे. असे असले तरी रावण हा त्याच्या कर्माने मेला हे देखील तितकेच सत्य आहे.
  • राखी बांधताना हे लक्षात ठेवा की बहिणीचे तोंड दक्षिण-पश्चिम दिशेला आणि भावाचे तोंड उत्तर-पूर्व दिशेला असेल अशा प्रकारे बसावे.
  • आपल्या भावाला प्लास्टिकची, तुटलेली, अशुभ किंवा काळी राखी बांधू नका. अशी राखी बांधणे भाऊ आणि बहीण दोघांसाठीही अशुभ असते.
  • रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात. या दिवशी बहिणीला तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू भेट देऊ नका. तसेच काचेच्या वस्तू, रुमाल किंवा शूज आणि चप्पल भेट म्हणून देऊ नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.