रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता दिसणार?

Chandra grahan timing in india 2026: या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण रक्षाबंधनाच्या दिवशी होणार आहे. भारतात ते केव्हा सुरू होईल आणि केव्हा संपेल, याबाबत जाणून घ्या...

रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता दिसणार?
चंद्र ग्रहण
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 12:26 PM

रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. म्हणजे २८ ऑगस्टला राखीच्या सणासोबतच ग्रहण सुरू होईल. पंचांगानुसार या ग्रहणाची सुरुवात २८ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांपासून होईल आणि ते सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनी संपेल. खरे तर हे आंशिक चंद्रग्रहण असेल. त्यासोबतच हे वर्षातील शेवटचे ग्रहणही असेल. यानंतर २०२६ मध्ये आणखी कोणतेही ग्रहण लागणार नाही. या ग्रहणाच्या परम अवस्थेच्या वेळी चंद्रमाचा बहुतेक भाग पृथ्वीच्या प्रच्छायेने पूर्णपणे झाकला जाईल. त्यात चंद्र कापलेला दिसेल. चला जाणून घेऊया ग्रहण कुठे-कुठे दिसेल आणि त्याचा कुठे परिणाम होईल.

कुठे कुठे दिसणार चंद्रग्रहण ?

हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागांमध्ये आणि अटलांटिक महासागरात दिसेल. व्हिएन्ना, पॅरिस, रोम, बर्लिन, प्राग, ब्रुसेल्स, मॅड्रिड, लंडन, रियो दि जानेरो, न्यूयॉर्क, जोहान्सबर्ग आणि ब्यूनस आयर्स या शहरांमध्ये दिसेल. तसेच हे चंद्रग्रहण पूर्णपणे दिसेल. २८ ऑगस्ट २०२६ चे चंद्रग्रहण भारत, बांगलादेश, चीन, जपान, नेपाळ, श्रीलंका आणि आशियाच्या बहुतेक भागांतून दिसणार नाही. त्यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांतून आणि पश्चिम पॅसिफिक महासागरातूनही हे ग्रहण दिसणार नाही.

भारतात दिसणार का?

या चंद्रग्रहणात सूतक काळ लागू होणार नाही, कारण हे ग्रहण भारतात दिसत नाही. चंद्रग्रहणाचे सूतक ग्रहण लागण्यापूर्वी ९ तास आधी सुरू होते. तर सूर्यग्रहणाचे सूतक १२ तास आधी सुरू होते.

चंद्रग्रहणाच्या वेळी जेवण खाणे आणि शिजवणे पूर्णपणे निषिद्ध आहे, कारण असे मानले जाते की या दरम्यान अन्न दूषित होते. तर गर्भवती स्त्रियांना या दरम्यान विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तसेच त्यांना घराबाहेर पडण्यासही मनाई आहे. याशिवाय ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांना कपडे धुण्यास, भाजी कापण्यास किंवा शिवण्यासही मनाई केली जाते. अशी मान्यता आहे की राहू आणि केतूच्या दुष्परिणामांमुळे मूल शारीरिकदृष्ट्या अपंग होऊ शकते, अशी मान्यता असल्याने ग्रहणकाळात गर्भवती महिलांना ही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

Follow Us