हे चार लोक सापापेक्षाही जास्त असतात विषारी, कधीच करू नका मैत्री, अन्यथा होईल मोठं नुकसान

सापापेक्षा जास्त विषारी असतात हे चार लोक. कधीच या लोकांसोबत मैत्री करू नका. अन्यथा होईल मोठं नुकसान. कोणते आहेत ते चार लोक? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Aug 30, 2026 | 6:25 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रातून जीवन जगताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. व्यक्तीचा स्वभाव, संगत आणि वागणूक यांचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो असे चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. त्यासोबतच चाणक्यांनी पुढील चार लोकांपासून नेहमी दूर राहवे असे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रातून जीवन जगताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. व्यक्तीचा स्वभाव, संगत आणि वागणूक यांचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो असे चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. त्यासोबतच चाणक्यांनी पुढील चार लोकांपासून नेहमी दूर राहवे असे सांगितले आहे.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार दुष्ट व्यक्तीची तुलना सापाशी केली जाते. सापाला धोका जाणवला तर तो प्रसंगी चावू शकतो; मात्र वाईट प्रवृत्तीची व्यक्ती वारंवार नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींवर सहज विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्यापासून शक्य तितके अंतर राखणे योग्य मानले जाते.

चाणक्य नीतीनुसार दुष्ट व्यक्तीची तुलना सापाशी केली जाते. सापाला धोका जाणवला तर तो प्रसंगी चावू शकतो; मात्र वाईट प्रवृत्तीची व्यक्ती वारंवार नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींवर सहज विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्यापासून शक्य तितके अंतर राखणे योग्य मानले जाते.

3 / 5
एखादी व्यक्ती दिसायला सुंदर, तरुण किंवा प्रतिष्ठित कुटुंबातील असली तरी तिच्याकडे योग्य ज्ञान आणि चांगले गुण नसतील तर केवळ बाह्य रूपाला महत्त्व देण्यात अर्थ नाही असं चाणक्य सांगतात. त्यामुळे व्यक्तीची ओळख तिच्या स्वभाव, विचार आणि गुणांवरून करावी.

एखादी व्यक्ती दिसायला सुंदर, तरुण किंवा प्रतिष्ठित कुटुंबातील असली तरी तिच्याकडे योग्य ज्ञान आणि चांगले गुण नसतील तर केवळ बाह्य रूपाला महत्त्व देण्यात अर्थ नाही असं चाणक्य सांगतात. त्यामुळे व्यक्तीची ओळख तिच्या स्वभाव, विचार आणि गुणांवरून करावी.

4 / 5
चाणक्य यांच्या मते माणसाने प्रामाणिक असावे, मात्र गरजेपेक्षा अधिक भोळे किंवा सरळ राहणे नुकसानकारक ठरू शकते. यासाठी चाणक्य जंगलातील सरळ झाडांचे उदाहरण देतात. सरळ झाडे सहज तोडता येत असल्याने ती आधी तोडली जातात तर वाकडी झाडे अनेकदा तशीच राहतात. त्याचप्रमाणे अतिसरळ व्यक्तींचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी सावध राहणे गरजेचे आहे.

चाणक्य यांच्या मते माणसाने प्रामाणिक असावे, मात्र गरजेपेक्षा अधिक भोळे किंवा सरळ राहणे नुकसानकारक ठरू शकते. यासाठी चाणक्य जंगलातील सरळ झाडांचे उदाहरण देतात. सरळ झाडे सहज तोडता येत असल्याने ती आधी तोडली जातात तर वाकडी झाडे अनेकदा तशीच राहतात. त्याचप्रमाणे अतिसरळ व्यक्तींचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी सावध राहणे गरजेचे आहे.

5 / 5
इतरांचे नुकसान करण्यासाठी सतत डावपेच आखणाऱ्या किंवा कारस्थान करणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवण्याचा सल्ला चाणक्य नीतीमध्ये दिला जातो. अशा लोकांच्या सहवासाचा परिणाम नकळतपणे आपल्या विचारांवर आणि वर्तनावर होऊ शकतो. त्यामुळे चुकीच्या संगतीपासून वेळेत दूर होणे आणि चांगल्या व्यक्तींची संगत निवडणे महत्त्वाचे ठरते.  टीप : वरील माहिती चाणक्य नीतीवरील उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. यातील विचार हे पारंपरिक नीतिवचनांवर आधारित असून, त्यांची आधुनिक जीवनातील उपयुक्तता व्यक्तिनुसार वेगळी असू शकते.

इतरांचे नुकसान करण्यासाठी सतत डावपेच आखणाऱ्या किंवा कारस्थान करणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवण्याचा सल्ला चाणक्य नीतीमध्ये दिला जातो. अशा लोकांच्या सहवासाचा परिणाम नकळतपणे आपल्या विचारांवर आणि वर्तनावर होऊ शकतो. त्यामुळे चुकीच्या संगतीपासून वेळेत दूर होणे आणि चांगल्या व्यक्तींची संगत निवडणे महत्त्वाचे ठरते. टीप : वरील माहिती चाणक्य नीतीवरील उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. यातील विचार हे पारंपरिक नीतिवचनांवर आधारित असून, त्यांची आधुनिक जीवनातील उपयुक्तता व्यक्तिनुसार वेगळी असू शकते.

Follow Us