AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : नेहमी सोबत ठेवा या चार गोष्टी, आयुष्यात कधीच तुमच्या प्रगतीला ब्रेक लागणार नाही

वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या तुमच्या भोवतालची नकारात्मक शक्ती कमी करण्यास मदत करतात. जर या गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्या तर त्याचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, अशाच काही वस्तूंबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : नेहमी सोबत ठेवा या चार गोष्टी, आयुष्यात कधीच तुमच्या प्रगतीला ब्रेक लागणार नाही
VASTUSHTRAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 8:36 PM
Share

वास्तुशास्त्र हे दोन मुख्य गोष्टींवर कार्य करतं, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा तुम्हाला प्रचंड त्रास होऊ शकतो. तुमचं मन अस्वस्थ होतं, सारखी चिडचिड होते. अचानक घरात आर्थिक समस्या सुरू होतात. काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होतात ही काही नकारात्मक ऊर्जेची लक्षणं आहेत. या उलट जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा याच्या उलट परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात. जसं की घराची भरभराट होते. तुम्हालाही प्रगतीच्या नवीन संबंध उपलब्ध होतात. व्यावसाय किंवा नोकरीमध्ये अकस्मात मोठा लाभ होतो. वास्तुशास्त्रानुसार जर घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करायाचा असेल तर ऊर्जेचं संतुलन साधलं गेलं पाहिजे. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नकारात्मक शक्ती तुमच्यापासून कोसो दूर राहते, चला तर मग या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

तांब्याचे नाणे – तुम्ही तुमच्या पर्स किंवा पाकिटात एक तांब्याचं नाणं ठेवू शकतात. याचे अनेक चमत्कारीक फायदे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही तुमच्या पाकिटात तांब्याचं नाणं ठेवलं तर त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात. तुम्हाला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होते. तसंच तुमचं मन शांत राहतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

चंदनाचा तुकडा – जर तुम्हाला तुमचामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, असं जाणवत असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आलं आहे. एक छोटासा चंदनाचा तुकडा तुमच्या पाकिटात किंवा खिशात ठेवा, यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होते.

केशर – जर तुम्हाला प्रसिद्ध हवी असेल, तुम्हालाही असं वाटत असेल की आपलीही ओळख व्हावी, आपण प्रसिद्ध व्हावं. लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा तर यासाठी तुम्ही जेव्हा एखाद्या कामासाठी घराबाहेर पडता तेव्हा तुमच्या खिशामध्ये केशरचे काही दाणे ठेवू शकतात. यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील.

विलायची – जर तुम्ही एखाद्या मोठ्या संधीच्या शोधात असाल किंवा काही महत्त्वाचं काम करायला जाणार असाल किंवा नोकरीसाठी मुलाखतीला जाणार असाल, अशा महत्त्वाच्या वेळी खिशात दोन ते तीन विलायची ठेवाव्यात. यामुळे कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, तुम्हाला त्या कामात यश मिळतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.