AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra: कपाटात ठेवलेल्या या 4 वस्तू ठरतात तुमच्या भाग्यामधील सर्वात मोठा अडथळा, आजच फेकून द्या

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला मोठं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या आसपास ज्या काही गोष्टी असतात त्यांचा तुमच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही गोष्टी घरात ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. ज्या तुमच्या भाग्याच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.

Vastushastra: कपाटात ठेवलेल्या या 4 वस्तू ठरतात तुमच्या भाग्यामधील सर्वात मोठा अडथळा, आजच फेकून द्या
VASTUSHTRAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 9:22 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषांवर विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आपण दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे वास्तुदोष दूर करणं आवश्यक असतं, वास्तुशास्त्रानुसार आपण कपाटात वेगवेगळ्या वस्तू ठेवतो, मात्र यातील काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. अशा वस्तूंमुळे तुमच्या घरात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं, किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तोटा होण्याची देखील शक्यता असते. अनेकांच्या बाबतीमध्ये तर असं घडतं, की ते खूप पैसा कमवतात, मात्र त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, तिजोरी रिकामी असते. या सर्वांमागे तुम्ही तुमच्या कपाटात ठेवलेल्या या चार वस्तू असू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?

फाटलेले किंवा जुने कपडे – अनेकांना अशी सवय असते की एखादा ड्रेस एकदा वापरला की तो पुन्हा वापरला जात नाही. किंवा अनेक ड्रेस असेही असतात जे कपाटात ठेवून ठेवून जीर्ण होतात. खराब होतात. असे कपडे कपाट ठेवणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्ठीकोणातून अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे. कारण यामुळे तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. जर तुम्हाला काही प्रगतीच्या संधी मिळणार असतील तर त्यामुळे या संधी उपलब्ध होण्यास देखील विलंब होतो. त्यामुळे घरात कधीही फाटलेले कपडे ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बंद पडलेलं घड्याळ – आपण आधी हातामध्ये घाण्यासाठी एखादं घड्याळ वापरत असतो. किंवा भिंतीवरचं एखादं घड्याळ खराब होतं. अनेकांना अशी सवय असते की ते हे बंद पडलेली घड्याळं फेकून देत नाहीत तर ती कपाटात ठेवतात. मात्र यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घड्याळाला वेळ आणि गतीचं प्रतिक मानण्यात आलं आहे. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. बंद पडलेलं घड्याळ हा तुमच्या प्रगतीमधील अडथळा ठरू शकतो.

फाटलेलं पाकीट किंवा पर्स- अनेक लोकांना अशी सवय असते की, ते फाटलेलं पाकीट किंवा पर्स फेकून न देता कपाटत ठेवतात. मात्र अशी पर्स किंवा पाकीट कपाटात ठेवणं हे वास्तुशास्त्रात अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे घरात किंवा कपाटात कधीही फाटलेलं पाकीट किंवा पर्स ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

चपला -अनेकांना सवय असते की आपल्या नव्या चपला किंवा बूट ते कपाटात ठेवतात. मात्र यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे कपाटात कधीही चपला ठेवू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत