AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप चावल्यानंतर का नाही करत व्यक्तीचे अंत्यसंस्कार? मृत व्यक्तीच्या शरीरासोबत घडतात या गोष्टी

बऱ्याचदा अनेकांना साप चावतात, पण तुम्हाला माहिती आहे का की साप चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत.... त्या मृत व्यक्तीच्या शरीरासोबत काय होतं... घ्या जाणून...

साप चावल्यानंतर का नाही करत व्यक्तीचे अंत्यसंस्कार? मृत व्यक्तीच्या शरीरासोबत घडतात या गोष्टी
फाईल फोटो
| Updated on: Aug 02, 2025 | 1:18 PM
Share

सापाचं नाव ऐकताच भीती वाटते…. पण आता ही एक सामान्य गोष्ट झाली. आजच्या घडीला विज्ञानाने प्रगती केली आहे. पण साप चावल्यानंतर काय? याबद्दल काही रुढी अशा आहेत, ज्यामुळे अनेकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. आपल्या हिदू धर्मात मृत्यूबद्दल अनेक समज आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, तेव्हा त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार होतात. त्या व्यक्तीला अग्नि दिला जातो नाही तर, जमीनात पुरलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे पूर्वी साप चावल्याने मृत्या झाल्यास काय करायचे? मृतदेहासोबत काय केलं जायचं… तर आज जाणून घेवू पूर्वी साप चावल्यानंतर काय व्हायचं…

सांगायचं झालं तर, भारतात सापांची पूजा केली जाते. याबाबत अनेक मान्यता देखील आहेत. साप आणि भगवान शंकर यांचा थेट संबंध असल्यामुळे सापाची देखील पूजा केली जाते. ज्यामुळे सापाबद्दल देखील अनेक मान्यता आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा साप चावल्याने मृत्यू होतो तेव्हा गावांमध्ये आणि काही भागात असं मानलं जातं की, ती व्यक्ती पूर्णपणे मेली नाही.

मृत व्यक्तीच्या शरीरासोबत काय केलं जातं…

लोकांचा असा विश्वास आहे की जर योग्य वेळी योग्य उपाय केला तर ती व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते. यामुळे, मृतदेह जाळला जात नाही किंवा मातीत पुरला जात नाही. अशा मृत्यूच्या बाबतीत, मृतदेह नदीत फेकून दिला जातो.

काय आहे कारण?

सांगायचं झालं तर, यामागे अनेक कारणं सांगितली जातात. पूर्वीच्या काळात, काही लोक विशेष मंत्र आणि औषधी वनस्पतींद्वारे सापाच्या विषाचा प्रभाव दूर करू शकत होते. नदी किनारी राहणारे लोकं मृतदेहांना पाहायचे आणि ते पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न करायचे. काही मान्यतेनुसार, पाण्यात गेल्याने शरीरातील विष बाहेर पडते. म्हणून, मृतदेह पाण्यात तरंगवणे ही ती व्यक्ती पुन्हा जिवंत होण्याची आणखी एक शक्यता मानली जात होती…

हिंदू धर्मात सापाचं महत्त्व…

भगवान शंकर आपल्या गळ्यात नागराज वासुकीला धारण करतात. याचा अर्थ आहे की ते मृत्यू, भय आणि वासना यांवर विजय मिळवलेला आहे. साप हा त्यांच्या तांडव नृत्यातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. हिंदू धर्मात साप फक्त एक जीव नाही, तर एक दैवी, आध्यात्मिक व पौराणिक प्रतिमा आहे. म्हणूनच त्याचा आदर आणि पूजेला विशेष महत्त्व आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.