AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात मंगळसुत्र उलटे का घालतात? तुम्हाला माहिती आहे का कारण?

मंगळसुत्राला सौभाग्याचा अलंकार मानल्या जाते. लग्नात वधूला मंगळसुत्र घालण्यामागे अनेक कारणं आहेत. ही परंपरा अगदी ऋषी मुनींच्या काळापासून चालत आलेली आहे. ही पद्धत सुरू करण्यामागे काही विशेष कारण होते असं अभ्यासकांचं मत आहे. जाणून घेऊया मंगळसुत्राबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

लग्नात मंगळसुत्र उलटे का घालतात? तुम्हाला माहिती आहे का कारण?
मंगळसुत्रImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 01, 2023 | 8:54 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अनेक रूढी आणि परंपरा या शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. लग्न परंपरा हीसुद्धा त्यापैकीच एक आहे. हिंदू धरमात लग्नाला अतिशय पवित्र स्थान दिले आहे. लग्नात सिमांत पुजनापासून ते मांडव परतणीपर्यंत अनेक विधी असतात. प्रत्त्येक विधीला काही ना काही महत्त्व सांगण्यात आले आहे. त्या पैकीच एक म्हणजे लग्न झाल्यानंतर नववधू मंगळसुत्र (Mangalsutra) उलटे घालते. किमान सव्वा महिना तरी ते उलटे घालावे असं गुरूजी सांगतात, मात्र यामागचं खरं कारण काय आहे हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? पंडित माधवशास्त्री पांडे यांनी शास्त्रामागचे कारण सांगितले आहे.

मंगळसुत्र उलटे घालण्यामागचे कारण

पुर्वीच्या काळी अगदी कमी वयातच मुलींचे लग्न व्हायचे. लग्न झाल्यानंतरही मुलींना वयात येण्यासाठी काही काळ बाकी असायचा. हे वय मुलीला आई बनण्यासाठी योग्य नाही त्यामुळे मुलगी वयात येणे तसेत तीची मासीक पाळी सुरू होणे अद्याप बाकी आहे हे कळण्यासाठी ती मंगळसुत्र उलटे घालायची. वयात आल्यानंतर ते सरळ करण्यात यायचे. हे खरंतर मंगळसुत्र उलटे घालण्यामागचे कारण आहे.

लग्नात मंगळसुत्राला का महत्त्व आहे?

अभ्यासकांच्या मते मंगळसुत्राला इतके महत्त्व देण्यामागे काही कारणे आहे. लग्न झाल्यानंतर दोन मंगळसुत्र घालण्यात येतात. एक सासरचं आणि एक माहेरचं असतं. सासरचं मंगळसुत्र हे छातीच्या खाली पोटापर्यंत असतं. मंगळसुत्रात दोन सोन्याच्या वाट्या आणि किमान चार काळे मणी असावे. मंगळसुत्राच्या वाट्यांमुळे मुलीच्या हृदयाला सकारात्मक उर्जा प्राप्त होते. लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावे लागते. नवीन वातारणाशी जुळवून घेण्यासाठी तीला अनेक तडजोडी कराव्या लागतात. अशा वेळी तीला मानसीक ताणही येतो. मंगळसुत्रामुळे निर्माण झालेली उर्जा मुलीला काही प्रमाणात बळ देते.

मंगळसुत्र हे स्त्री विवाहीत असल्याचे दर्शवते.समाजात वावरतांना बऱ्याचदा लोकांची वाईट नजर महिलेवर पडते. अशावेळी तीच्यासाठी हक्काचा पुरूष तीच्यासोबत आहे असा अलिखीत संदेश समाजात जातो. याशिवाय काळे मणी हे नकारात्मक उर्जेपासूनही बचाव करतात. बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल मंगलसुत्र उपलब्ध आहे. मात्र जाणकार लोकं आजही दोन सोन्याच्या वाट्या असलेल्या मंगळसुत्रालाच प्राधान्य देतात.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.