AUSvsIND : भारतासमोर विजयासाठी तब्बल 299 धावांचं आव्हान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

Adelaide Oval, Adelaide : ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलंय. शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावा यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. पण शेवटच्या शतकांमध्ये मॅक्सवेल आणि मार्शला बाद केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळेतच वेसन घातली. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत हा सामना जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. कारण, पहिला सामना […]

AUSvsIND : भारतासमोर विजयासाठी तब्बल 299 धावांचं आव्हान
Follow us on

Adelaide Oval, Adelaide : ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलंय. शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावा यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. पण शेवटच्या शतकांमध्ये मॅक्सवेल आणि मार्शला बाद केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळेतच वेसन घातली.

तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत हा सामना जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. कारण, पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतलं आव्हान कायम राखण्यासाठी भारताला ही महत्त्वाची लढत आहे. पण ऑस्ट्रेलियाने मोठं आव्हान दिल्यामुळे सर्व मदार आता भारतीय फलंदाजांवर असेल.

भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचला केवळ सहा धावांवर चालतं केलं. त्यानंतर मोहम्मद शमीने अॅलेक्स केरीला 18 धावांवर बाद केलं. पण शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजाने चांगली भागीदारी केली. ही भागीदारी ख्वाजाला धावबाद करुन जाडेजाने मोडित काढली. शॉन मार्शला पीटर हँड्सकॉम्ब आणि मार्कस स्टॉईनिसने छान साथ दिली. त्यानंतर मॅक्सवेलने आक्रमक खेळी करत 48 धावा केल्या.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने 45 धावा देऊन 4, मोहम्मद शमीने 58 धावांच्या बदल्यात 3, तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण करत असेलल्या मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराजने 10 षटकात सर्वाधिक 76, तर कुलदीपने 66 धावा दिल्या.

सिडनीच्या सामन्यात 289 धावांचं आव्हान होऊनही भारताला पराभव पत्करावा लागला होता. कारण, सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली आणि अंबाती रायुडू स्वस्तात माघारी परतले होते. यावेळी सर्व फलंदाजांना एकत्रित कामगिरी करावी लागेल तेव्हाच हा सामना जिंकता येईल.