CWG 2022: सात्विक-चिराग जोडी बनली चॅम्पियन, बॅडमिंटन मध्ये भारताची गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक

भारताने कॉमनवेल्थ गेम्सच्या अखेरच्या दिवशी बॅडमिंटन मध्ये गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

CWG 2022: सात्विक-चिराग जोडी बनली चॅम्पियन, बॅडमिंटन मध्ये भारताची गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक
Sairaj-chirag
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 6:50 PM

मुंबई: भारताने कॉमनवेल्थ गेम्सच्या (CWG 2022) अखेरच्या दिवशी बॅडमिंटन मध्ये गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक पूर्ण केली. महिला एकेरीत पी.व्ही.सिंधु, त्यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, त्यानंतर सात्विक साईराज रँकीरेड्डी (satwik sairaj rankireddy) आणि चिराग शेट्टी (chirag shetty) जोडीने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे. भारताच्या नंबर 1 जोडीने इंग्लंडच्या लेन आणि वेंडी जोडीवर विजय मिळवला. भारताच पुरुश दुहेरीतील हे गोल्ड मेडल आहे. याआधी या जोडीने 2018 मध्ये रौप्य पदक विजेती कामगिरी केली होती.

45 मिनिटात जिंकलं गोल्ड

सात्विक आणि चिराग जोडीने 45 मिनिट चाललेल्या सामन्यात 21-15, 21-13 असा सामना जिंकला. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने बॅडमिंटन मध्ये तीन गोल्ड मेडल्स मिळवली आहेत. सात्विक-चिराग जोडीने शानदार प्रदर्शन केलं. त्यांना पदकासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. चिराग शेट्टी आणि सात्विकची जोडी याआधी दोनदा इंग्लंडच्या जोडीला भिडली होती. दोन्ही टीम्सनी प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला होता. वर्ष 2019 मध्ये डेन्मार्क ओपन मध्ये इंग्लंडची जोडी जिंकली होती. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सात्विक-चिरागने सामना जिंकला होता.

भारताने सरळ गेम्स मध्ये जिंकलं मेडल

पहिल्या गेम मध्ये भारतीय जोडीने नेटजवळ पकड मिळवली. त्यामुळे विजय मिळवण्यात त्यांना अडचण आली नाही. दुसऱ्या गेम मध्ये यजमानांनी पुनरागमन केलं. मॅच रोमांचक वळणार चालली होती. वेंडीने ड्रॉप शॉट्स खेळून भारतीय जोडीला हैराण केलं. पण त्याला सात्विक-चिराग जोडीवर आघाडी मिळवता आली नाही. ब्रेक पर्यंत भारताने 16-11 अशी आघाडी मिळवली होती. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागली नाही.

Non Stop LIVE Update
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय.
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?.
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार.
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.