AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खिशात घातल्यानंतर सूर्यकुमार यादवने मोकळं केलं मन, काय ते सर्व सांगतिलं

ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली. त्यामुळे रविवारी होणारा पाचवा सामना औपचारिकता असणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात हा मालिका विजय आहे. तसेच भारतात सलग 14 मालिका जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खिशात घातल्यानंतर सूर्यकुमार यादवने मोकळं केलं मन, काय ते सर्व सांगतिलं
IND vs AUS : मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव बरंच काही बोलून गेला, अखेर सांगून टाकलं काय ते
| Updated on: Dec 01, 2023 | 11:02 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने जिंकली. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यापैकी तीन सामने भारताने जिंकले. भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली. त्यामुळे सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात हा पहिला मालिका विजय आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं होतं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची संधी दिली नाही. तसेच हवं तसं दव न पडल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार वेडचं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला. दव न पडल्याने भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन हावी झाले. फिरकीपटूंनी जबरदस्त गोलंदाजी केली. रवि बिष्णोई आणि अक्षर पटेल यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बॅकफूटला ढकललं.सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने मन मोकळं केलं.

काय म्हणाला कर्णधार सूर्यकुमार यादव?

“सर्वकाही ठरवल्याप्रमाणे घडलं.मुलांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं. सामन्यापूर्वीच आम्हीच ठरवलं होतं की बिनधास्तपणे येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं. दडपण होतं तेव्हा मी अक्षर पटेलची निवड केली. त्याने उत्तम गोलंदाजी केली. डेथ ओव्हरमध्ये यॉर्करचा प्लान होता तसंच सर्व काही घडलं.”, असं सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर सांगितलं.

रवि बिष्णोई काय म्हणाला?

“मला टीम इंडियासाठी चांगली गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. आज मी चांगली गोलंदाजी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. मी आज माझ्या गोलंदाजीने खूश आहे. मी अशीच कामगिरी भविष्यात करत राहीन. आमच्या संघात बरेच तरूण खेळाडू आहेत. प्रत्येक जण चांगली कामगिरी करत आहे. गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांचे आभार. त्यांनीही मला मोलाची साथ दिली.”, असं रवि विष्णोई याने सांगितलं.

रवि बिष्णोई याने 4 षटकात फक्त 17 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. तसेच अक्षर पटेलने 4 षटकात 16 धावा देत तीन गडी बाद केले. दुसरीकडे भारताची स्थिती नाजूक असताना फलंदाजीच रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी जबरदस्त खेळी केली. रिंकू सिंहचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. तर जितेश शर्माने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.

महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?.
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?.
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.