AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 5 th20 : अर्शदीप सिंहचे शेवटचे घातक सहा बॉल, कांगारूंचा स्वप्नभंग, वेड चारीमुंड्या चीत

Arshdeep Singh Ind vs aus t20 Last Over : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात अर्शदीप सिंहने कमाल केली. गेलेला सामना पठ्ठ्याने जिंकवला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटच्या ओव्हरचा थरार कसा पार पडला जाणून घ्या.

IND vs AUS 5 th20 : अर्शदीप सिंहचे शेवटचे घातक सहा बॉल, कांगारूंचा स्वप्नभंग, वेड चारीमुंड्या चीत
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 04, 2023 | 3:56 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये कांगारू सहा धावांनी पराभूत झाले. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वात भारताने 4-1 ने टी-20मालिका जिंकली. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये भारताच्या अर्शदीप सिंहने घातक मारा करत सामना भारताच्या पारड्यात झुकवला. एकवेळ अशी होती का भारत पूर्णपणे पिछाडीवर पडला होता. कांगारूंच्या मोक्याच्या वेळी विकेट गेल्या आणि भारताने ऑस्ट्रेलियाला मालिकेचा शेवट गोड करून दिला नाही. शेवटच्या ओव्हरमधील थरार, वाचा सविस्तार.

शेवटच्या ओव्हरमधील ओव्हर

ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. मात्र कांगारूंच्या संघाचा कॅप्टन मॅथ्यू वेड मैदानात असल्याने त्याच्याासाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती. मात्र युवा अर्शदीप सिंहने टिच्चून मारा केला, पहिला बॉल बाऊन्सर टाकला होता जो वेड मारण्यात यशस्वी ठरला नाही. त्याने वाईड असल्याची पंचांकडे मागणी केली परंतु ती फेटाळली. दुसरा बॉल अर्शदीपने एक कडक यॉर्कर टाकला त्यावरही एकसुद्धा धाव निघाली नाही. तिसरा बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात वेड कॅच आऊट झाला.

चौथ्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फने एक धाव घेतली. त्यानंतर पाचवा बॉल अर्शदीपच्या हाताला लागून पंचांना लागला. त्यामुळे चौकार अडला गेला आणि त्यावरही एकच धाव निघाली.  सहाव्या बॉलवर म्हणजेच शेवटच्या बॉलवर 8 धावांची गरज होती. त्यावरही अर्शदीपने एकच धाव दिली. आपल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त तीन धावा दिल्या.

दरम्यान, भारताने प्रथम फंलदाजी करताना 160-8 धावा केल्या होत्या. कांगारूंच्या संघाला जिंकण्यासाठी 161 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठालाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 20 ओव्हरमध्ये 154-8 धावा करू शकला. भारताने शेवटचा सामनाही जिंकत मालिका 4-1 ने जिंकली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी