AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri lanka Crisis: संकटात साथ दिल्याबद्दल सनथ जयसूर्याने मानले भारताचे आभार

Sri lanka Crisis: 90 च्या दशकात वनडे क्रिकेट (ODI Cricket) मध्ये मोठा बदल घडवून आणणारा श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्याने (Sanath jayasuriya) भारताचे आभार मानलेत.

Sri lanka Crisis: संकटात साथ दिल्याबद्दल सनथ जयसूर्याने मानले भारताचे आभार
sanath jaysurya
| Updated on: Jul 11, 2022 | 3:25 PM
Share

मुंबई: 90 च्या दशकात वनडे क्रिकेट (ODI Cricket) मध्ये मोठा बदल घडवून आणणारा श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्याने (Sanath jayasuriya) भारताचे आभार मानलेत. संकटकाळात भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी हात पुढे केलाय, त्याबद्दल मी आभार मानतो, असं सनथ जयसूर्या म्हणाला. “श्रीलंकेत (Sri lanka) जे घडतय, ते जगातील सगळेच देश जवळून बघतायत. या परिस्थितीत मदतीसाठी आम्ही भारताचे आभारी आहोत” असं श्रीलंकेच्या या माजी आक्रमक फलंदाजाने म्हटलं आहे. 90 च्या दशकात वनडे क्रिकेट मध्ये सुरुवातीच्या 15 षटकात फटकेबाजी करण्याची सुरुवात सनथ जयसूर्याने केली. खेळाडू रिंगणात असताना, डोक्यावरुन मोठे फटके खेळण्याची सुरुवात जयसूर्यापासून झाली. या नंतर वनडे क्रिकेटच स्वरुप मोठ्या प्रमाणात बदललं. 300, 350 धावांचा पाठलाग करणं अनेक संघांना शक्य झालं.

भारत काय मदत देणार आहे?

सनथ जयसूर्याने ज्या मदतीबद्दल भारताचे आभार मानलेत, त्या बद्दल जाणून घेऊया. आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेला भारताने 3.8 अब्ज अमेरिकन डॉलरची मदत देण्याची तयारी दाखवली आहे.

भारताने काय म्हटलय?

श्रीलंकेत जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याची कल्पना आहे. कठीण परिस्थितीतून श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. श्रीलंकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर भारताचं बारीक लक्ष आहे. भारताच्या याच कृतीच सनथ जयसूर्याने कौतुक केलय.

पेट्रोल-डिजेलची मदत

“IMF, भारत आणि अन्य देश श्रीलंकेची मदत करत आहेत. भारत सकंट सुरु झाल्यापासूनच मदत करतोय. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. श्रीलंका कठीण परिस्थितीत असताना, भारताने दिलेलं योगदान खूप मोठं आहे” असं जयसूर्याने म्हटलं आहे. भारताने श्रीलंकेला डीजेल आणि पेट्रोलची मदत केलीय. श्रीलंकन जनता पेट्रोलियम पदार्थांच्या कमतरतेचा सामना करतेय. भारताने मोठ्या प्रमाणात श्रीलंकेत पेट्रोल पाठवलं आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...