AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir | विराटच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत कधीच बोललो नाही : गौतम गंभीर

गौतम गंभीरने विराट कोहलीवर (Virat Kohli) याआधी अनेकदा टीका केली आहे.

Gautam Gambhir | विराटच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत कधीच बोललो नाही : गौतम गंभीर
विराट कोहली आणि गौतम गंभीर
| Updated on: Feb 01, 2021 | 6:40 PM
Share

मुंबई : “मी केव्हाही विराट कोहलीच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. तसेच मी कधीही विराटच्या (Virat Kohli) वनडे किंवा टेस्ट क्रिकेटमधील नेतृत्व गुणांवर शंका घेतली नाही. विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया यशस्वी कामगिरी करेल”, अशा शब्दात टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir)  चक्क विराटचं कौतुक केलं आहे. गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित होता. गंभीरला विराटच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळेस गंभीरने हे उत्तर दिलं. (Gautam Gambhir praises Team India captain Virat Kohli)

गंभीर काय म्हणाला?

“मी नेहमीच विराटच्या टी 20 मधील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विराटच्या कॅपटन्सीमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आहे. टीम इंडिया कधीच 2-3 खेळाडूंवर अवलंबून राहिला नाही. कोहलीनेही यासंदर्भातील वक्तव्य अनेकदा केलं आहे, ” असंही गंभीरने यावेळेस स्पष्ट केलं. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात आयपीएलच्या 13 व्या मोसमात विजेतेपद मिळवून दिले. यानंतर विराटऐवजी रोहित शर्माला टीम इंडियाच्या टी 20 मधील कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात यावी, अन्यथा हे टीम इंडियासाठीच नुकसानकारक ठरेल, असं गंभीर म्हणाला होता.

तेव्हा गंभीर काय म्हणाला होता?

“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर ते टीम इंडियासाठी नुकसानाचं असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते निकष आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत”असं गंभीर म्हणाला होता. “तसेच कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान संधी मिळावी. जेणेकरुन दोघांची तुलना करताना एकच निकष लावता येईल”, असं गंभीर म्हणाला होता.

दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराटचे संघात पुनरागमन झालं आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या कसोटी मालिकेला चेन्नईत सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : विराट कोहली धोनीसारखा दबाव हाताळू शकत नाही : गौतम गंभीर

IPL 2020 | अश्विनला दोन वर्षात हटवलं, एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का? : गंभीर

PHOTO | विराटच्या तुलनेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम, रोहितला टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : गौतम गंभीर

(Gautam Gambhir praises Team India captain Virat Kohli)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.