Virat Kohli ने आपल्या बॅटिंगने देशवासियांना जिंकलं, पण त्यांचं कोट्यवधीच नुकसान

विराट कोहलीच्या बॅटिंगने सर्वांना समाधान, आनंद दिला. मग कोणाचं नुकसान कसं काय होऊ शकतं?

Virat Kohli ने आपल्या बॅटिंगने देशवासियांना जिंकलं, पण त्यांचं कोट्यवधीच नुकसान
Virat-Kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 25, 2022 | 12:11 PM

मुंबई: टीम इंडियाने (Team India) रविवारी पाकिस्तान विरुद्धचा (IND vs PAK) सामना जिंकला. टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने हा विजय मिळवला. त्यामुळे दिवाळीच्या आंनदात आणखी भर पडली. तमाम देशवासियांचा ऊर अभिमानाने भरुन आला. टीम इंडियाचा विराट विजय देशवासियांना एक वेगळं समाधान देऊन गेला. विराट कोहली या मॅचचा हिरो ठरला.

विराटची बॅटिंग आणि व्यापाऱ्यांच्या तोट्याचा काय संबंध?

विराटवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. पण याच विराट कोहलीमुळे व्यापारी वर्गाला थोडा तोटा सहन करावा लागला. तुम्ही म्हणाल विराटची बॅटिंग आणि व्यापाऱ्यांच्या तोट्याचा काय संबंध?. खरंतर भारत-पाकिस्तान सामना ऐन दिवाळीमध्ये झाला. त्यात रविवारी ही मॅच होती.

शॉपिंगला फटका

दिवाळीतला रविवारी हा ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठी सोयीचा दिवस असतो. ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतो, तर व्यापाऱ्यांकडच्या सामनाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण रविवारी भारत-पाकिस्तान सामना, त्यात विराट कोहलीच्या बॅटिंगमुळे दिवाळी शॉपिंगला फटका बसला. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

किती टक्क्याने घट?

विराट कोहलीची बॅटिंग सुरु असताना शॉपिंगमध्ये जवळपास 20 टक्क्याने घट झाली. भारत-पाकिस्तान सामन्याच्या संपूर्ण वेळेत UPI व्यवहारात 7 ते 20 टक्क्याने घट झाली. कोहलीने या मॅचमध्ये 53 चेंडूत नाबाद 82 धावा फटकावल्या. ग्रुप 2 मध्ये सुपर 12 राऊंडमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर 4 विकेट राखून विजय मिळवला.

पाकिस्तानची बॅटिंग सुरु असताना....

भारत-पाकिस्तान सामना मोठ्या प्रमाणात टीव्हीवर पाहिला जातो. मॅच सुरु होताच यूपीआय ट्रॅनजॅक्शनमध्ये घट झाली. लोक शॉपिंगसोडून मॅचकडे वळले. पाकिस्तानची बॅटिंग सुरु असताना यूपीआय व्यवहार सरासरीपेक्षा कमी होता.

शॉपिंग नॉर्मल कधी झाली?

भारतपे डाटानुसार भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी शॉपिंग पीकवर होती. मॅच सुरु झाल्यानंतर त्यात 7 टक्के घट झाली. विराट कोहलीची बॅटिंग सुरु असताना त्यात मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली. मॅच संपल्यानंतर यूपीआय व्यवहार नॉर्मल झाले. दुपारी 1.30 ते संध्याकाळी 5.45 या शॉपिंगच्या प्राइम वेळात व्यापाऱ्याचं नुकसान झालं. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर शॉपिंगमध्ये वाढ झाली.

Follow Us