AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: ‘हा’ आहे भारत, ‘हे’ आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्यातील पंतचा ‘तो’ VIDEO व्हायरल

भारताने विश्वचषकाच्या अखेरच्या सामन्यात नामिबीयाला नमवत स्पर्धेचा शेवट गोड केला. पण या सामन्यात आणखी एक गोड गोष्ट घडली. ऋषभ पंतचा खेळाप्रतिचा सन्मान एका कृत्यातून दिसून आला.

T20 World Cup: 'हा' आहे भारत, 'हे' आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्यातील पंतचा 'तो' VIDEO व्हायरल
ऋषभ पंत संघासोबत
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 4:27 PM
Share

T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket team) यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) अतिशय सुमार कामगिरी केली. सुरुवातीचे दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत पुनरागमन करता आलचं नाही आणि सेमीफायनलपूर्वीच भारत स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींची मनं तुटली असली तरी अखेरच्या नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या एका कृतीने साऱ्याच भारतीयांची मनं तर जिंकलीच पण भारतासाठी क्रिकेट म्हणजे काय हे पण दाखवून दिलं.

तर झालं असं, भारत आणि नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात नामिबीयाचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. सामन्यातील 9 व्या ओव्हरमध्ये निकॉलने रन आउट होण्यापासून वाचण्याकरत झेप घेतली. त्यावेळी भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा पाय बॅटला लागला. त्यावेळी लगेचच ऋषभने बॅटच्या पाया पडत क्रिकेट आणि त्याची साधनं भारताला किती महत्त्वाची आहेत हे दाखवून दिलं. भारतात क्रिकेटलाच नाही तर कोणताही व्यक्ती करत असलेल्या कामाप्रती तो किती सन्मान देतो हे या कृतीतून दाखवून दिलं. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतं असून नेटकरी या व्हिडीओला खूप प्रेम देत आहेत.

असा पार पडला सामना

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय़ अगदी बरोबर असल्याचं दाखवत फिरकी गोलंदाजीसह वेगवान गोलंदाजीने नामिबिया संघाला 132 धावांत रोखलं. यावेळी यावेळी फिरकीपटू आश्विन आणि जाडेजाने प्रत्येकी 3 तर बुमराहने 2 विकेट घेतले. नामिबीयाकडून डेविड विसे याने सर्वाधिक 26 धावा केल्या.

133 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने सुरुवातच जबरदस्त केली.  सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अर्धशतकं झळकावत सामना एकहाती भारताच्या पारड्यातचं ठेवला. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने राहुलला 25 धावांची साथ देत विजय पक्का केला. सामन्यात रोहितने 37 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकार ठोकत 56 धावा केल्या. तर राहुलनेही अर्धशतक ठोकत 36 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकार ठोकत नाबाद 54 धावा केल्या.

इतर बातम्या

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

8 चेंडूत ठोकल्या 40 धावा, रहाणे-शॉसमोर छत्तीसगडचा फलंदाज पडला भारी, मुंबईचा संघ 1 रनने पराभूत

(In india vs namibia match Rishabh pant pays respect to namibia players bat video went viral)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.